राज्य सरकारकडून महावितरणला एकाच दिवशी दोन मोठे निधी वर्ग करण्यात आले आहेत.
मोफत वीज योजनेसाठी 2 हजार 026 कोटी तसेच 1 हजार 800 रुपये कोटी वितरित करण्यात आले आहेत.
राज्यातील 7.5 एचपी पर्यंतच्या कृषी पंप ग्राहकांना मोफत वीज देण्यात येणार आहे.
शासनाकडून एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत योजना सुरु ठेवण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे, याची आपल्याला जाणीव आहे.
मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत.