रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते.
मात्र भौतिक सुपीकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे.
त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो.
म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीला केला पाहिजे.
गांडूळ खत हे आज उपलब्ध असल्यास सेंद्रिय खतांपैकी उत्कृष्ट खत आहे.
त्यावर या पुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे.
दिवसेंदिवस जमिनीची उपजाऊक शक्ती कमी होत आहे.
जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या घटून त्या मृतप्राय झालेल्या आहेत.
शेत जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक दृष्ट्या अपरिमित हानी होत आहे.अधिक माहितीसाठी