ऊस पाचटातील पोषक घटक जाळून नष्ट करण्याऐवजी त्याचे जमिनीवर आच्छादन केल्यास अधिक फायदा होतो.
पाचटाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास जमिनीच्या सुपीकता व सजीवितेसाठी उपयुक्त ठरते.
बहुतांश शेतकरी शेताच्या स्वच्छतेसाठी म्हणून पाचट जाळतात.
पाचट हाताळण्यातील अडचणी, पाचटाने झाकले गेल्यास खोडव्याची उगवन कमी होणे .
नंतर आंतरमशागतीमध्ये येणारे अडथळे यामुळे शेतकऱ्यांना पाचट जाळणे ही पारंपारिक पद्धती अधिक सोयीची वाटते.
उसाच्या पाचटांमधील कर्ब:नत्र यांचे गुणोत्तर हे 122:1 असे असते.
यातील कर्बाचे प्रमाण अधिक असले तरी नत्राची उपलब्धता कमी असल्याने जिवाणूंना अधिक वेळ लागतो.
कर्बामुळे जिवाणूंना ऊर्जा मिळते, तर नत्रापासून प्रथिने मिळतात.
जिवाणूंच्या चांगल्या वाढीसाठी पिकांच्या अवशेषातील कर्ब नत्र गुणोत्तर 24:1 असे असावे. अधिक माहितीसाठी