आपले सरकार सेवा केंद्राच्या सेवा शुल्काबाबत शासनाचा नवा जीआर, वाचा सविस्तर;

राज्यामध्ये 2018 च्या जीआर नुसार प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आपले सरकार सेवा केंद्र स्थापनेसाठी मंजुरी देण्यात आलेले आहे.

यामध्ये काही बदल करून आता प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर कमीत कमी दोन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे.

महाराष्ट्र राज्याचे झपाट्याने होणारे डिजिटायझेशन नागरिकांना सेवा सुविधांची असलेली आवश्यकता ही काळाची गरज आहे.

याच पार्श्वभूमीवर हा एक महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये 05 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये कमीत कमी चार केंद्र स्थापन करता येतील.

प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रामध्ये किमान दोन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करता येतील.

मात्र, लोकसंख्या जर 5000 पेक्षा जास्त असेल तर अशा नगर पंचायतीला किमान चार केंद्र स्थापन करता येणार आहेत.

या निकषांमध्ये वेळोवेळी बदल करता येतील.

ज्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर कमीत कमी दोन आपले सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी