Ujani Dam 2025 सोलापूर : उजनी धरणातून आजपासून कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा मंत्र्याच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यातील आमदारांनी केलेल्या मागणीनुसार उजवा डावा कालव्यात सलग 60 दिवस पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उजनी पाणी वापर सल्लागार समितीची बैठक मंत्रालयात जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली.
बैठकीला सोलापूर पालकमंत्री जयकुमार गोरे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप सोपल, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजू खरे, आमदार नारायण पाटील, आमदार अभिजीत पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे यांची उपस्थिती होती.
उजनी धरणातून जिल्ह्यातील शेती, साखर कारखाने, प्रक्रिया उद्योग, एमआयडीसी पिण्यासाठी पाणी वापरले जाते. शेती पिण्याचा पाणीपुरवठा यांची पाणीपट्टी वसुलीची मोहीम राबवली जाते.
मात्र, या तुलनेत साखर कारखान्यांची पाणीपट्टी वसूल होत नाही याकडे उपस्थितांनी लक्ष वेधले. ही कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टीची रक्कम असून ती तातडीने वसूल करण्याचे आदेश दिले.
उजनीतून उजवा आणि डाव्या कालव्याद्वारे दोन पाणी पाळ्या सोडण्याचा निर्णय झाला. पहिली पाळी गुरुवारी दिनांक 6 मार्चपासून तर दुसरी पाळी दिनांक 15 एप्रिल पासून असणार आहे.
साखर कारखान्याची पाणीपट्टी वसूल करा…
वर्षानुवर्षे साखर कारखाना दारांकडे प्रलंबित असलेली पाणीपट्टी वसुलीचे आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज बोलवलेल्या सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.
सूक्ष्म कृषी सिंचन योजनेच्या अनुदानाबाबत महत्त्वाचा शासन निर्णय, वाचा सविस्तर
बर्ग्यांची दुरुस्ती करणार..Ujani Dam 2025
भीमा आणि सीना नद्यावर बांधलेले बंधारे 40 वर्षांपूर्वीचे आहेत जुन्या काळात बांधलेले हे बंधारे सातत्याने नादुरुस्त होत आहेत. त्यावर टाकलेले बरगे नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असते. याकडे जलसंपदा मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. सदरचे नाम दुरुस्त बरगे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश दिले.

इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |