टेंभू-म्हैसाळ योजनेद्वारे माण व कोरडा नदीत कधी सोडणार पाणी ? Tembhu Mhaisal Yojana 2025

Tembhu Mhaisal Yojana 2025 टेंभू-म्हैसाळ योजनेतून सोडलेल्या पाण्यातून सांगोला तालुक्याच्या लाभ क्षेत्रातील उन्हाळी आवर्तनाचे रोटेशन संपल्यानंतर माण व कोरडा नदीत पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना टेंभू-म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी वाट पाहावी लागणार असल्याचे दिसत आहे.

Tembhu Mhaisal Yojana 2025

सांगोला तालुक्याच्या शेतीच्या पाण्यासाठी तारणहार ठरलेल्या टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व म्हैसाळ योजनेतून लाभ क्षेत्रात सध्या आवर्तन सुरू आहे.

टेंभू योजनेतून सुमारे 17 हजार हेक्टर क्षेत्र किमी 0 ते 50 किमीपर्यंत कालव्याद्वारे, तर तेथून पुढे बंदिस्त नलिकेद्वारे ओलिताखाली येत आहे, तर म्हैसाळ योजनेतून सुमारे 4 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे.

दरम्यान, टेंभू प्रकल्पात सद्य: स्थितीत पुरेसे पाणी उपलब्ध असल्याने लाभधारक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार 1 मार्चपासून उन्हाळी पाण्याचे आवर्तन सुरू केले आहे.

राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीचे आवक…पहा आजचे ज्वारी बाजार भाव !

टेंभूच्या लाभ क्षेत्रातील रोटेशन झाल्यानंतर शिल्लक पाणी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत नियोजन झाल्यानंतर माण नदीत सोडून खवासपूरपासून ते मेथवडे पर्यंत बंधारे भरून दिले जाणार आहेत.

तशाच प्रकारे म्हैसाळद्वारे शेतीच्या पाण्याचे रोटेशन संपल्यानंतर कोरडा नदीवरील सोनंद, जवळा, आलेगाव, मेडशिंगी बंधारे भरून दिले जाणार आहे.

WhatsApp Group Join Now

Tembhu Mhaisal Yojana 2025 नदीद्वारे पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्या!

  • उन्हाची तीव्रता वाढल्याने सांगोला तालुक्यातील माण, कोरडा, बेलवण नदीवरील बंधाऱ्यातील पाणी संपुष्टात येऊ लागल्यामुळे नदी काठावरील शेतकऱ्यांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
  • प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी वेळीच नियोजन करून माण व कोरडा नदीत पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Tembhu Mhaisal Yojana 2025 बुध्देहाळ मध्यम प्रकल्पात 75 टक्के पाणी

बुध्देहाळ मध्यम प्रकल्पात सुमारे 75 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे टेंभू योजनेतून बुध्देहाळ तलावात पाणी सोडण्याचे सद्य:स्थितीला नियोजन नाही, असेही सांगितले जात आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment