उन्हाळी पिके आणि फळ पिकांसाठी काय आहे; कृषी सल्ला ? Summer Crop Management 2025

Summer Crop Management 2025 तापमानात आणि बाष्पीभवनात वाढ संभवत असल्याने भात खाचरात पाण्याची पातळी 5 सें.मी. पर्यंत नियंत्रित करावी. भात पीक फुटवे येण्याच्या अवस्थेत नत्र खताची दुसरी मात्रा 875 ग्रॅम युरिया प्रति गुंठा देण्यात यावी.

Summer Crop Management 2025

मुंबई येतील प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ता. 14 ते 18 मार्च या काळात हवामान कोरडे व मेघ आच्छादनरहित असेल, तर ठाणे जिल्ह्यात कोरडे ते अंशतः ढगाळ राहील. तसेच किमान व कमाल तापमान 21 ते 36 अंश सेल्सिअसपर्यंत असेल. विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ईआरएफएस) कोकण विभागात दिनांक 18 ते 24 मार्च 2025 दरम्यान पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये कमाल व किमान तापमान अनुक्रमे 33.9 व 20.7 अंश सेल्सिअस एवढे असते, या वर्षी ते अनुक्रमे 34.4 व 21.4 अंश सेल्सिअस एवढे असण्याची शक्यता आहे.

शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी सीएससी केंद्रांवर गर्दीच गर्दी! 5 मिनिटांत घरबसल्या अशी करा नोंदणी…

उन्हाळी भात-फुटवे अवस्था

तापमानात आणि बाष्पीभवनात वाढ संभवत असल्याने भात खाचरात पाण्याची पातळी 5 सें.मी. पर्यंत नियंत्रित करावी. भात पीक फुटवे येण्याच्या अवस्थेत नत्र खताची दुसरी मात्रा 875 ग्रॅम युरिया प्रति गुंठा देण्यात यावी.

WhatsApp Group Join Now

Summer Crop Management 2025 भुईमूग-फुलोरा ते आऱ्या येण्याची स्थिती

पेरणीनंतर 45 ते 50 दिवसांनंतर भर दिलेल्या भुईमुगाच्या पिकावरून रिकामे पिंप फिरवावे. पिंप फिरविल्याने जमिनीत घुसणाऱ्या आऱ्यांची आणि परिणामतः शेंगांची संख्या वाढते. त्यामुळे भुईमुगाचे उत्पादन वाढते.

कोरडे हवामान, तापमान वाढ व वाढता वाऱ्याचा वेग यामुळे सांद्रीभवन प्रक्रियेत वाढ होते. अशातच जमिनीतील पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे पिकास ताण बसतो. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता टाळण्यासाठी भुईमूग पिकास फुलोरा अवस्थेत असताना पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर 10 ते 12 दिवस ठेवावे.

लागवडीनंतर 30 ते 35 दिवसांनी गरजेनुसार खुरपणी करून घ्यावी. नंतर पिकाला स्वस्तिक अवजाराने मातीची भर द्यावी.

मोहरी-शेंगा भरणे ते पक्वता अवस्था

मोहरी पिकाच्या सुमारे 90 टक्के शेंगा पिवळसर झाल्यावर सकाळच्या वेळी कापणी करावी. कापलेले पीक उन्हात 2 ते 3 दिवस वाळवावे. नंतर मळणी व उफणणी करून काडीकचरा व दाणे वेगळे करावेत.

WhatsApp Group Join Now

कडधान्य पिके-पक्वतेची अवस्था

वाल, चवळी, मूग, कुळीथ या पिकांच्या पक्व शेंगा उन्हामुळे तडकून नुकसान होऊ शकते. ते कमी करण्यासाठी जसजशा शेंगा वाळतील तसतशी शेंगांची तोडणी सकाळच्या वेळेस करावी. शेंगा उन्हात ४ ते ५ दिवस वाळवून व मळणी करून कोरड्या सुरक्षित जागी साठवाव्यात.

Summer Crop Management 2025 कलिंगड-काढणी

कलिंगडाच्या फळांचे सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी फळे भाताच्या पेंढ्याने किंवा गवताने झाकून घ्यावीत.

नारळ-फळधारणा

नारळावर रुगोज चक्राकार पांढरी माशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. या किडीची पिले आणि प्रौढ पानांच्या खालील बाजूस राहून रस शोषतात. पानांवर रुगोज चक्राकार माशीचे पांढरे मेणचट तंतू दिसून येतात. माशी गोड चिकट स्राव सोडत असल्याने त्यावर वातावरणातील बुरशीची वाढ होऊन पाने काळी पडलेली दिसतात. किडीच्या प्रादुर्भावासाठी बागेचे नियमित निरीक्षण करावे. किडीच्या व्यवस्थापनासाठी माडावर निम तेल (0.5 टक्का) 5 मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे 15 दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात. त्यानंतर 10 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या तीन फवारण्या प्रेशर पंपाच्या साह्याने कराव्यात. यामुळे मित्र कीटकांचे संवर्धन होऊन किडींचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होण्यास मदत होईल.

नवीन लागवडीच्या नारळ रोपे व त्यांची पाने कडक उन्हामुळे करपतात. ते टाळण्यासाठी रोपांना वरून सावली करावी. या बागेत तीन ते चार वर्षे वयापर्यंतच्या माडांना 3 ते 4 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावी.

पूर्ण वाढलेल्या माडांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे 5 ते 6 दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. नारळाच्या मोठ्या झाडास ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावयाचे असल्यास प्रति दिन 40 लिटर पाणी द्यावे. माडाच्या आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी माडाभोवती वाळलेल्या गवताचे 15 सें.मी. जाडीचे आच्छादन किंवा नारळाच्या सोंडणे पुरावेत आणि झावळ्यांचे आच्छादन करावे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा


Leave a Comment