Summer Crop 2025 अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. यवतमाळ जिल्ह्यात मागील 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसाने काढणीच्या अवस्थेतील भूमी काढणीच्या अवस्थेतील भुईमूग, ज्वारी, मुग आणि तीळ पिकांचे मोठे नुकसान केले आहे.

हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकरी अधिकच धास्तावले आहेत. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे उत्पादनात घट आणि बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींना जबर फटका बसला आहे.
बेदाणा उत्पादक अवकाळीने अडचणीत; पावसामुळे सुकलेला बेदाणा पुन्हा भिजला!
यवतमाळ जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 14 मिमी पावसाची नोंद झाली असून, यामुळे उन्हाळी पिकांवर संक्रांत ओढवली आहे. भुईमूग, ज्वारी, मुग आणि तीळ या पिकांची काढणी सुरू असतानाच पावसाच्या सततच्या सरींनी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादनात घट, मजुरांचा अभाव आणि बाजारात दर घसरणीमुळे आर्थिक संकट ओढवले आहे.
Summer Crop 2025 पावसाचे पिकांवर परिणाम
मागील वर्षी चांगला पाऊस झाला होता, त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामासाठी पीक नियोजन केले. मात्र, काढणीच्या टप्प्यावर असलेल्या पिकांवर पावसाने हजेरी लावल्यामुळे ज्वारी काळवंडत आहे. मुगाच्या शेंगा सडू लागल्या आहेत तर तिळाच्या कोतळ्यांना ओलावा बसल्याने उत्पादन धोक्यात आहे.
शेतकऱ्यांकडून काढणीचे काम वेळेत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पण मजुरांची टंचाई अधिकच अडचणीत भर घालते आहे.
भुईमूग उत्पादकांच्या चिंतेत भर
लाखनवाडा खुर्द, जयरामगड, शिरला नेमाने, पिंपरी धनगर परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात भुईमूग लागवड केली होती. मात्र, यंदा हवामानातील अनियमित्ता नियमितता कीड आणि रोगांमुळे उत्पादन घटले. याशिवाय बाजारात दर घसरल्यामुळे केलेल्या खर्चाची हे भरपाई होत नाही.
एका बॅगेसाठी 7-8 हजार रुपये मजुरी खर्च येतो, त्याशिवाय बियाणे खते मशागत यावर मोठा खर्च झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Summer Crop 2025 शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या
- उत्पादनात लक्षणीय घट
- बाजारभावात मोठी घसरण
- मजुरी आणि निविष्ठांचा खर्च वाढला
- एका बॅगेसाठी 7-8 हजार रुपयांचा खर्च
- कर्ज व उदारी दोन पीक घेतले पण परतफेडीची चिंता
- खरीप हंगामासाठी भांडवल उभे करणे ही कठीण
Summer Crop 2025 हवामान विभागात अलर्ट
हवामान विभागाने पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाकडून पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानाची योग्य दखल घेऊन त्यांना भरपाई देण्याची मागणी होत आहे. जिल्हा प्रशासनाने तत्काळ सर्वेक्षण करून योग्य ते पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पावसाची नोंदणी (मिमीमध्ये)
तालुका | पावसाची नोंद (मिमी) |
झरी | 37 |
केळापूर | 27 |
घाटंजी | 21 |
वणी | 19 |
मारेगाव | 19 |
राळेगाव | 14 |
नेर | 14 |
बाभुळगाव | 13 |
कळंब | 13 |
यवतमाळ | 12 |
अरणी | 9 |
दारव्हा | 8 |
पुसद | 10 |
दिग्रस | 6 |
उमरखेड | 5 |
महागाव | 2 |
इतर माहीतीसाठी | येथे क्लिक करा |