Solar Pump Yojana 2025 जळगाव: शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली ‘मागील त्या सौर कृषीपंप’ ही योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. मात्र, पैसे भरून चार महिने झाले तरी कंपनीकडून सौर पंपाचा पुरवठा केला जात नसल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत.

Solar Pump Yojana 2025 शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा विनामूल्य वीज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3, 5 आणि 7.5 एचपी क्षमतेचे पंप दिले जातात. या पंपाचा पुरवठा करण्यासाठी अनेक कंपन्या उपलब्ध आहेत.
गेल्या आठ दिवसात उजनी धरणात किती टक्के पाणीपातळी वाढली? धरणात किती पाणीसाठा?
Solar Pump Yojana 2025 मागील अनेक महिन्यापासून तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी शुल्क भरणा करून कंपनीची ही निवड केली आहे. मात्र, अशा शेतकऱ्यांना जवळपास दोन ते तीन महिन्याहून अधिक कालावधी होऊनही सौर पंप दिला जात नसल्याने ही योजना मृगजळ ठरल्याची चर्चा आहे.

शेतकऱ्यांना महावितरण कंपनी दिवसा व रात्री अशा सत्रात शेतीसाठी 8 तास वीजपुरवठा देते, तोही कमी दाबाचा असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी अडचण येत होती. परंतु दिवसा वीज उपलब्ध व्हावी, जेणेकरून शेतकऱ्यांना रात्री शेतात पिकांना पाणी देताना अनेक हिस्त्र प्राणी, साप,अर्धी पासून जीविताला धोका उत्पन्न होणार नाही, असे शेतकऱ्यांनी म्हटले होते. यासाठी राज्य शासनाने ‘मागेल त्याला सौर पंप’ ही योजना आणली.
Solar Pump Yojana 2025 क्षेत्रानुसार मिळतोय क्षमतेचा सौर कृषी पंप
मागेल त्याला सौर पंप या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40 आर. ते 1 हेक्टर क्षेत्रासाठी 3 एचपी चा पंप खर्च 22,975 रुपये 1 ते 2 हेक्टरसाठी 5 एचपी चा पंप 32,100 व 5 हेक्टर पेक्षा जास्त 7.5 एचपी चा पंप 45 हजार रुपये शुल्क भरून सौर पंप उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाण्याची गरज नाही.
Solar Pump Yojana 2025 विशिष्ट प्रवर्गानुसार भरावी लागतेय रक्कम
सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप किमतीच्या 10 टक्के, तर अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांना 5 टक्के रक्कम भरून सौर पंपाचा पूर्ण संच दिला जातो. उर्वरित रक्कम राज्य व केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून दिले जाते. परंतु या योजनेअंतर्गत अनेक कंपन्या शेतकऱ्यांना शुल्क भरणा, कंपनी निवडूनही सौर पंप बसविण्यास टाळाटाळ करत आहेत.
‘मागेल त्याला सौर पंप’ या योजनेअंतर्गत मी 3 एचपी पंपासाठी अर्ज केला होता व मंजूर ही झाला. त्यासाठी नियमानुसार शुल्क भरणा करून कंपनीची ही निवड एप्रिल 25 मध्ये केली; परंतु अद्यापही सौर पंप बसविण्यात आलेला नाही. -किशोर पाटील, शेतकरी, महिंदळे
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |