PM Kisan Yojana 2025 पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेपासून वंचित राहिलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना जोडले जात आहेत. पंतप्रधान किसान योजनेतून वगळलेल्या शेतकऱ्यांना जोडण्यासाठी मोहीम सुरू करण्यात येणार आहे.

पीएम किसान योजनेत लाखो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे आणि शेतकरी आजही काही त्रुटीमुळे या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी संधी दिली आहे. जे शेतकरी पात्र आहेत, परंतु अद्याप योजनेत सामील झालेले नाहीत, त्यांचे मागील हफ्ते मिळण्यास मदत होणार आहे. नव्याने योजनेत सामील होऊन लाभ घेता येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय; वाचा सविस्तर…
PM Kisan Yojana 2025 योजनेचा लाभ कसा मिळवायचा ?
- जर तुम्ही शेतकरी असाल आणि अद्याप पंतप्रधान किसान योजनेत सामील झाला नसाल, तर सरकारने तुम्हाला आणखी एक संधी दिली आहे.
- सरकार 15 एप्रिल 2025 पासून चौथी मोहीम सुरू करणार आहे.
- ज्यामध्ये नवीन पात्र शेतकरी जोडले जातील म्हणजेच नवीन शेतकऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही आवश्यक अटी घातल्या आहेत.
- शेतकऱ्याकडे शेती योग्य जमीन असावे. इ केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.
- पीएम किसान पोर्टल व नोंदणी करणे आवश्यक आहे.
- जर तुम्ही या तीन अटी पूर्ण केल्या तर तुम्ही या योजनेचा लाभार्थी होऊ शकतात.

WhatsApp Group
Join Now
PM Kisan Yojana 2025 अर्ज कसा करावा ?
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर सोप्या स्टेप्स फॉलो करा:
- पीएम किसान पोर्टल वर जा.
- नवीन शेतकरी नोंदणी वर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक एंटर करा आणि (OTP) ओटीपी द्वारे पडताळणी करा.
- सर्व आवश्यक माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा.
- काही दिवसात तुमच्या अर्जाची स्थिती निश्चित करा.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |