Pik Vima Yojana 2025 राज्यातील शेतकऱ्यांचा हित लक्षात घेऊन, खरीप 2025 हंगामासाठी अंतर्गत अधिसूचित केलेल्या पेरू, संत्री, लिंबू आणि द्राक्ष पिकांसाठी कर्जदार आणि कर्ज नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी अंतिम तारीख 30 जून 2025 पर्यंत वाढविण्यास केंद्र सरकार मान्यता देण्यात आली आहे. वाढीव कालावधीत होणाऱ्या नोंदणीसाठी प्रीमियमचा गोल हिचा देखील देय असेल.

मृगबहारातील संत्रा या पिकाची 14 जूनला सहभाग मुदत संपलेली होती. या पार्श्वभूमीवर केंद्राने शेतकरी सहभागांसाठी 30 जून पर्यंत अंतिम मुदत वाढवलेली आहे. तरी सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना सूचित करण्यात येते की, आपल्या जवळच्या बँक शाखा, सीएससी सेंटर (सेतू) वर जाऊन आपल्या शेतातील फळ पिकाचा विमा उतरवून घ्यावा ही विनंती.
शेतकऱ्यांना ‘पुर्णा’ कडून मिळाला दिलासा; उसाच्या वाढीव हप्तापोटी 9 कोटी 98 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर केले वर्ग!
Pik Vima Yojana 2025 फळ पिके
संत्रा (मृग बहार) | शेवटची तारीख 30 जून 2025 |
मोसंबी (मृग बहार) | शेवटची तारीख 30 जून 2025 |
प्रीमियम | (रक्कम प्रति हेक्टरी) |
संत्रा | 5000 |
मोसंबी | 5000 |

Pik Vima Yojana 2025 आवश्यक कागदपत्रे
- सातबारा
- बँक खाते पासबुक
- आधार कार्ड
- स्वयंघोषणापत्र
- बागेचा फोटो
सन 2025 पासून पिक विमा व फळ पिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी क्रमांक आवश्यक आहे. याशिवाय त्यांना सहभाग घेता येणार नाही. पीक आणि फळ पिक विमा योजनेत सहभाग घेणार शेतकऱ्यांना एपिक पाहणी मध्ये नोंद अत्यावश्यक आहे. सर्व शेतकऱ्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता तारखेच्या आत विमा उतरून घ्यावा.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |