पीकविमा योजनेतून सरसकट 17,500 रुपये मिळणार का? कोणत्या निकषाआधारे ठरणार नुकसान भरपाई? Pik Vima Nuksan Bharpai 2025

Pik Vima Nuksan Bharpai 2025 पुणे: खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने 31 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यात पीकविमा योजनेतून हेक्टरी साडेसतरा हजार रुपये देऊ, असे अश्वासन दिले होते.

Pik Vima Nuksan Bharpai 2025

Pik Vima Nuksan Bharpai 2025 प्रत्यक्षात हि मदत महसूल मंडळातील पीककापणी प्रयोगातून आलेल्या सरासरी उत्पादनावर अवलंबून असणार आहे. मात्र, महसूल मंडळानुसार हे उत्पादन बदलणारे आहे.

द्राक्षशेती वातावरणातील बदल.. एक नवे आव्हान!!

Pik Vima Nuksan Bharpai 2025 त्यानुसार विमा कंपनी भरपाई देईल. त्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना मिळेलच याची खात्री नाही.

WhatsApp Group Join Now

Pik Vima Nuksan Bharpai 2025 पीकविमा योजनेत 90 टक्के शेतकरी सोयाबीन उत्पादक असून, आतापर्यंत राज्यातील महसूल मंडळातील सुमारे 82 टक्के पीक कापणी प्रयोगाचे प्रयोगातील उत्पादनाचे आकडे हाती आले आहेत.

सर्व अहवाल येण्यासाठी 15 डिसेंबरचा कालावधी लागेल त्यानंतरची हि मदत देण्यात येईल खरिपात पावसामुळे शेतकऱ्यांची स्वप्ने पाण्यात वाहून गेली.

सरासरी उत्पादन शून्य: Pik Vima Nuksan Bharpai 2025

या सरासरीची गेल्या पाच वर्षांमधील सरासरी उत्पादनाशी (उंबरठा उत्पादन) तुलना केली जाणार आहे.

उंबरठा उत्पादनापेक्षा सरासरी उत्पादन कमी असल्यास संबधित महसूल मंडळातील शेतकरी नुकसानभरपाईला पात्र असतील.

उदाहरणार्थ सरासरी उतपादन उंबरठा उत्पादनाच्या 10 टक्के कमी असल्यास विमा संरक्षित रकमेच्या दहा टक्केच भरपाई शेतकऱ्यांना मिळेल.

WhatsApp Group Join Now

हे उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या 100 कमी असल्यास अशांना संपूर्ण विमा संरक्षित रक्कम भरपाई म्हणून मिळेल.

सोयाबीनसाठी हि विमा संरक्षण रक्कम 56 हजार रुपयांपर्यंत आहे.

संपूर्ण नुकसानभरपाई मिळण्यासाठी महसूल मंडळातील सरासरी उतपादन शून्य असणे अपेक्षित आहे.

नुकसानभरपाई डिसेंबर अखेरच: Pik Vima Nuksan Bharpai 2025

सोयाबीन काढणीचा हंगाम संपल्याने महसूल मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग राबविण्यात आले आहेत.

आतापर्यंत राज्यातील 82 टक्के महसूल मंडळामधील पीक कापणी प्रयोगाचे आकडे कृषी विभागाकडे प्राप्त झाले आहेत.

उर्वरित 18 टक्के मंडळामधील आकडेवारी ही 15 डिसेंबरपर्यंत प्राप्त होईल.

त्यामुळे योजनेतून शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसानभरपाई डिसेंबरअखेरच मिळू शकेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment