नुकसानग्रस्त पिकाच्या पंचनाम्यास केलेला विलंब भोवला; कृषी सहायक,अधिकारी, ग्रामसेवकांना तहसीलदारांनी पाठवली नोटीस, Pik Nuksaan 2025

Pik Nuksaan 2025 जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील 18 गावांमध्ये अवकाळी पाऊस झाला होता. यामध्ये शेती आणि शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

Pik Nuksaan 2025

मात्र, एक महिना होऊन देखील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. यामुळे संबंधित गावांच्या कृषी सहाय्यक, ग्राम महसूल, अधिकारी ग्रामसेवक, यांच्यासह ग्रामविकास अधिकारी, यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

राज्यात मुसळधार पाऊस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला पावसाचा रेड सिग्नल वाचा सविस्तर;

Pik Nuksaan 2025 तालुक्यातील काही गावांमध्ये 5 मे 7 मे दरम्यान अवकाळी पाऊस गारपीट व वादळी वाऱ्यांमुळे फळबाग व इतर शेती पिकांचे 33% पेक्षा जास्त नुकसान झालेले होते.

WhatsApp Group Join Now

अशा ठिकाणचे प्रथम प्राधान्याने प्रत्यक्ष मोक्यावर जाऊन ग्राम महसूल अधिकारी ,कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, यांच्या पथकाचे संयुक्त पंचनामे करण्यासंदर्भात तहसीलदार यांनी आदेश दिले होते.

परंतु, संबंधित अधिकारी यांनी केवळ शेतकरी संख्या व क्षेत्र कळविलेले होते. त्यानंतर एक महिनानंतर सुद्धा परिपूर्ण पंचनामे व अहवाल सादर न केल्याने प्रभारी तहसीलदार हेमंत तायडे यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

Pik Nuksaan 2025 17 जून पर्यंत अहवाल द्या

यामध्ये म्हटले आहे की शेती पीकनिहाय परिपूर्ण पंचनामे सादर केलेले नाही. तसेच उपविभागीय अधिकारी यांनी सोमवारी 16 जून रोजी घेतलेल्या व्हीसीमध्ये तात्काळ पंचनामे जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कार्यालयाकडून पंचनामे व अहवाल विमा विलंब 17 जून पर्यंत प्रत्यक्ष तहसील कार्यालयात सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते.

WhatsApp Group Join Now

वरिष्ठांकडून सूचना देऊनदेखील मरगळलेल्या कर्मचारी यांनी नैसर्गिक आपत्ती सारख्या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा कारणांवरून त्यांना नोटीस पाठवून 24 तासांच्या आत पंचनामे सादर करण्यामध्ये का विलंब झाला याचा खुलासा करावा असे निर्देश दिले.

Pik Nuksaan 2025 नुकसानीची टक्केवारी 33 टक्के पेक्षा कमी असेल, प्राथमिक अहवाल कळविला तीन दिवसात सक्षम पाहणी करून तात्काळ संयुक्त स्वाक्षरीचा अहवाल का सादर केले नाही, याचा देखील खुलासा सादर करावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

Pik Nuksaan 2025 ‘या’ गावात आतापर्यंत झाले नाहीत पंचनामे!

सोमठाणा, राळा, केळीगव्हाण, निकळक, भराडखेडा, उज्जैन पुरी, वाल्हा कंडारी बु. नाजीक, पांगरी, गेवराई बाजार, गोकुळवाडी, अकोला, अन्वी, देवगाव, बावनी, आसरखेडा या गावांची नावे आहेत. या गावातील तलाठ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

23 रोजी करावा लागणार खुलासा!!

23 जून रोजी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात हजर राहून खुलासा सादर करावा, अशी सूचना बदनापूरच्या तहसीलदारांनी कर्मचाऱ्यांना दिली आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment