ई-केवायसी चुकली…गेल्या महापुरातील दोन हजार शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अडकली! Nuksan Bharpai 2025

Nuksan Bharpai 2025 कोल्हापूर मागील वर्षा अतिवृष्टीमुळे झालेला नुकसान भरपाईची रक्कम अजूनही जिल्ह्यात एक दोन हजार शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

Nuksan Bharpai 2025

या शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्यामुळे त्यांची 99 लाख 18 हजार 210 इतकी रक्कम अजूनही जिल्हा प्रशासनाकडे आहे. यंदा मे मध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.

अवकाळी पावसाने स्वप्नांची राख; टोमॅटो उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान वाचा सविस्तर;

Nuksan Bharpai 2025 मुख्यमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमतने गेल्या वर्षीच्या नुकसानीचे किती पैसे मिळाले याची माहिती घेतली. मागील वर्षे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.

WhatsApp Group Join Now

त्यानंतर तातडीने पंचनामे केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे नुकसान भरपाईची रक्कम थेट बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे. त्यासाठी शेतकरी ई-केवायसी करून घेणे बंधनकारक केले आहे.

मात्र, अजूनही 1 हजार 992 शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही किंवा त्यांच्या ई-केवायसी मध्ये त्रुटी आढळल्याने त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. तोपर्यंत नव्या वर्षातील पावसाळा सुरू झाला आहे.

Nuksan Bharpai 2025 म्हणून ई-केवायसी नाही

  • ई-केवायसी म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार नंबरला जोडून घ्यायचे आहे.
  • पण अजूनही अनेक शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही.
  • काही जणांचा आधार नंबर चुकला आहे तर काहीजणांचे बँक खाते क्रमांक चुकले आहे.
  • दुरुस्तीचे अर्ज देऊनही ते अपडेट झालेले नाही

अशा कारणामुळे ई-केवायसी योग्य झालेली नाही त्यामुळे रक्कम मिळाली नाही असे त्रांगडे आहे.

WhatsApp Group Join Now

दृष्टीक्षेपात नुकसान भरपाई!

बाधित शेतकरी1 लाख 08 हजार 829
जिल्ह्याला मिळालेली रक्कम122 कोटी 42 लाख 37 हजार
मंजूर रक्कम24 कोटी 52 लाख 19 हजार 533
खात्यावर जमा झालेली रक्कम21 कोटी 68 लाख 88 हजार 768
केवायसी प्रलंबित शेतकरी1 हजार 992
प्रलंबित रक्कम99 लाख 18 हजार 210

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment