शेतीसाठी थेट लाभ हस्तांतरणावर आधारित थेट गुंतवणुकीस प्रोत्साहन देणारी योजना सुरू, वाचा सविस्तर; New Mahadbt Yojana 2025

New Mahadbt Yojana 2025 राज्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि शेतीतील अस्तथिरतेला तोंड देण्यासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 29 एप्रिल 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला अंतिम मंजुरी देण्यात आली असून याविषयीचा अधिकृत जीआर (GR) नुकताच आला आहे.

New Mahadbt Yojana 2025

ज्यानुसार आता शेतीमध्ये थेट भांडवली गुंतवणूक वाढवून आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी स्वतंत्र नवी योजना राबवण्यास अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. या नव्या योजनेचा पाया नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पावर आधारित असून शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer – DBT) तत्वावर आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

ई-मोजणी ‘व्हर्जन 2’ मुळे राज्यात जमीन मोजण्या होतायत वेगात; शिल्लक मोजण्या लवकरच होणार!

या योजनेत कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर, जलसंधारणासाठी शेततळे, सूक्ष्म सिंचन, ठिबक आणि तुषार सिंचन, संरक्षित शेतीसाठी शेडनेट, हरितगृह, पॉलिहाऊस, प्लास्टिक मल्विंग, क्रॉप कव्हर, काटेकोर शेती (precision farming), काढणी पश्चात व्यवस्थापन, कोल्ड स्टोरेज, गोडाऊन, पॅक हाऊस, शेळीपालन, फळबाग लागवड, रेशीम उद्योग यांचा समावेश करण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now

New Mahadbt Yojana 2025 प्राधान्य गटना विशेष संधी

या योजनेत अत्यल्प व अल्पभूधारक, महिला शेतकरी व दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. लाभ वाटप जिल्हानिहाय लक्षांक निश्चित करून प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार होणार आहे. जिल्हाधिकारी स्तरावर तयार होणाऱ्या जिल्हा आराखड्याच्या आधारे अंमलबजावणी करण्यात येईल.

राज्याच्या अर्थसंकल्पातून निधीची तरतूद

New Mahadbt Yojana 2025 या योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात आली असून दरवर्षी राज्याच्या अर्थसंकल्पातून आवश्यक निधीची तरतूद केली जाईल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षण जनजागृती व प्रत्यक्षिकांसाठी एकूण निधीपैकी एक टक्के रक्कम राखीव ठेवण्यात येणार आहे. याशिवाय तृतीय पक्षाद्वारे यादृच्छिक मूल्यमापनासाठी 0.1% निधी राखीव ठेवण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now

New Mahadbt Yojana 2025 संजीवनी प्रकल्पाचा यशस्वी अनुभव

2018 पासून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुरू झालेला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राज्यातील 16 जिल्ह्यातील 5220 गावांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात आला. त्याच्या पहिल्या टप्प्याच्या यशानंतर दुसरा टप्पा 21 जिल्ह्यातील 7201 गावे समाविष्ट करण्यात आले. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे नव्या योजनेचा विचार पुढे आला असून उर्वरित गावांमध्ये शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतीचा सर्वांगीण विकास साधण्याचे दिशा

राज्य शासनाच्या या नव्या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गरजा नुसार थेट आर्थिक मदत मिळाले. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन व उत्पन्न वाढेल, शाश्वत शेतीला चालना मिळेल आणि हवामान बदलांशी सामना करण्याची क्षमता वाढेल, असा शासनाचा विश्वास आहे. पायाभूत सुविधा काढणी पश्चात मूल्यवर्धन व शाश्वत व्यवस्थापन या सर्व गोष्टींचा समावेश असल्याने ही योजना शेतीचा सर्वांगीण विकास घडविणारे ठरणार आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment