राज्यात आता सुधारित पिक विमा योजना, पहा काय-काय बदल झालेत? Navin Pik Vima Yojana 2025

Navin Pik Vima Yojana 2025: 2022 पासून राबवलेल्या पिक विमा योजनेचा आढावा घेतल्यानंतर, त्यामध्ये सुधारणा करून राज्य शासनाने सण २०२५-२६ या वर्षाकरिता उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा राबवण्यास मान्यता दिली आहे. तसेच केंद्र शासनाने Cup & Cap Model (80:110) मॉडेलनुसार योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता मान्यता दिली आहे.

Navin Pik Vima Yojana 2025

खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या एक वर्षाकरिता राज्यात राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खरीप 2025 रब्बी हंगाम 2025-26 या 1 वर्षाकरिता, राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून 1 वर्षासाठी निवड करण्यात आलेली आहे.

यंदा जून मध्येच ‘अलमट्टी’ 61 टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Navin Pik Vima Yojana 2025 योजनेची उद्दिष्टे:

  • नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगांसारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.
  • पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
  • शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
  • कृषी क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरून उत्पादनातील जोखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविध करण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढते साध्य होण्यास मदत होईल.

WhatsApp Group Join Now

Navin Pik Vima Yojana 2025 योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये

सदरची योजना ही या आदेशा मुळे अधिसूचित केलेल्या पिकांसाठी केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी लागू असेल.

पंतप्रधान पिक विमा अर्जदार तसेच बिगर कर्जदारशेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदारांचे व्यक्तिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. मात्र, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या नोंदणीकृत भाडे करार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे.

WhatsApp Group Join Now

Navin Pik Vima Yojana 2025 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2 टक्के रब्बी हंगामासाठी 1.5% तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम २०२५-२६ या 1 वर्षाकरिता सर्व अधिसूचित पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.

अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील 7 वर्षांपैकी सर्वाधिक उत्पादनाच्या 5 वर्षाचे सरासरी उत्पादन गुणीले त्या पिकाचा जोखीम स्तर विचारात घेऊन निश्चित केले जाईल.

सदरची योजना ही एकूण बारा जिल्हा समूहासाठी निवडलेल्या पिक विमा कंपन्यांमार्फत सन 2025-26 या एक वर्षाकरिता 80:110 कप मॉडेल नुसार राबविण्यात येईल. त्यामध्ये नुकसान भरपाई चे दायित्व संबंधित विमा कंपनीवर राहणार आहे.

Navin Pik Vima Yojana 2025 विमा कंपन्या एक हंगामामध्ये जिल्हा समूहातील एकूण जमा विमा हप्ता रकमेच्या 110% किंवा एकूण विमा संरक्षित रकमेवर बर्न कॉस्ट नुसार येणाऱ्या विमा हप्त्याच्या 110% यापैकी जे जास्त असेल, त्यापर्यंतचे दायित्व स्वीकारतील व यापुढील दायित्व राज्य शासन स्वीकारेल आणि जर देय पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा समूहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रकमेपेक्षा कमी असेल तर विमा कंपनी जमा विमा हप्ता रकमेच्या जास्तीत जास्त 20 टक्के रक्कम स्वतःकडे ठेवेल व उर्वरित विमा हप्ता रक्कम राज्य शासनाला विहित वेळेत परत करेल.

या योजनेत मृत शेतकऱ्यांच्या नावे तसेच. इतर अवैध मार्गांनी विमा काढला गेल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल.

योजनेमध्ये सहभागी शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे अनिवार्य असेल.

Navin Pik Vima Yojana 2025 पिक विमा नुकसान भरपाईसाठी पिक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करणे बंधनकारक राहील.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment