Nashik Dam Storage 2025 नाशिक : यंदा पावसाळ्यात वरूणराजाने नाशिकवर कृपादृष्टी ठेवल्याने जिल्ह्यातील धरणसमूहात यंदा चांगले पाणी शिल्लक आहे. त्यातच टँकरच्या मागणीतही फारशी वाढ झालेली नाही. मात्र, उन्हाचा वाढता तडाखा आणि पाण्याचे आवर्तन यामुळे केवळ 10 दिवसातच जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा तब्बल 7 टक्क्यांनी घटक 41 टक्क्यांवर आला आहे.

नाशिककरांची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरण समूहात सद्यस्थिती 56.80 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 10 दिवसांपूर्वी गंगापूर धरण समूहात 60.63 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. म्हणजेच 10 दिवसात हा साठा सरासरी 4 टक्क्यांनी कमी झाला आहे. मागील वर्षी याचवेळी समूहात केवळ 47.43 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यामुळे ऐन फेब्रुवारीच्या मध्यावरच चिंतेचे ढग जमा झाले होते.
राज्यात उष्णतेचा पारा चाळीशीपार; सर्वाधिक तापमान कुठे? वाचा सविस्तर;
Nashik Dam Storage 2025 यंदा मात्र गतीवर्षीपेक्षा पाणीसाठा जास्त असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. गंगापूर धरण समूहातील गोदावरी नदीवरील गंगापूर धरण हे सर्वात मोठे असून काश्यपी, गौतमी, गोदावरी मध्यम स्वरूपाचे, तर आळंदी नदीवरील मध्यम स्वरूपाचे आळंदी अशी एकूण चार धरणे आहेत. जिल्ह्यातील धरणांमध्ये गतीवर्षीच्या तुलनेत यंदा 10 टक्के अधिक पाणीसाठा असल्याने अद्यापही पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली नाही.

Nashik Dam Storage 2025 इगतपुरीतील सहा पाड्यांचा पाणी प्रश्न सोडला तर जिल्ह्याला अद्यापही टँकरची गरज भासलेली नाही. मागील दोन वर्षात जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने सुमारे 399 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. इगतपुरीतील वाळविहिरी, पायरवाडी, खडकवाडी, तळ्याची वाडी, बकुळीची वाडी, बैरोबावाडी या पाड्यांसाठी पहिला टँकर सुरू झालेला आहे.
Nashik Dam Storage 2025 गंगापूर समूहात 56 टक्के
गंगापूर धरण समूहात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 5774 दलघफू अर्थात 56 टक्के जलसाठा शिल्लक असून, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 3,623 दलघफू जलसाठा शिल्लक आहे. कश्यपी या मध्यम धरण प्रकल्पात 21 टक्के, आळंदी धरण प्रकल्पात 34 टक्के शिल्लक आहे.
जिल्ह्यातील सर्व धरण प्रकल्पांमध्ये सध्या 27 हजार 310 दलघफू( 41.59 टक्के) जलसाठा शिल्लक असून, पावसाळ्यापर्यंत हा जलसाठा शेतीच्या आणि पिण्यासाठी वापरावयाचा असल्याने पाणी जपून वापरावे. मागील वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात धरणांमध्ये 20 हजार 731 दलघफू अर्थात 31 टक्के जलसाठा शिल्लक होता. यांना हाच जलसाठा 27 हजार 310 दलघफू आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |