Namo Kisan Hapta 2025 पुणे : पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू असलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना यापुढे 6 हजारांऐवजी 9 हजार रुपये देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार महिन्यांपूर्वी दिले होते.

योजनेचा पुढील हप्ता खरीप हंगामापूर्वीच देऊ असेही सांगितले होते. मात्र, यासाठी अतिरिक्त 3 हजार कोटींची तरतूद न झाल्याने आश्वासनांचा बाबत राज्य सरकारच्या पातळीवर कोणतीही हालचाल दिसून येत नाही.
यंदाच्या खरीप पासून पिक विम्याचा भार आता शेतकऱ्यांवर पडणार, किती हप्ता येणार?
Namo Kisan Hapta 2025 दरम्यान, या दोन्ही योजनांसाठी ॲग्रीस्टॅक योजनेतील शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला असला तरी नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी अद्याप त्यांची कार्यवाही झाली नसल्याचेही दिसून आले. नमो शेतकरी सन्मान योजनेत सातव्या हप्त्यासाठी राज्यात 93 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत.

पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या वितरणप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना तीन हप्त्यात दिल्या जाणाऱ्या 6 हजार रुपयांमध्ये आणखी तीन हजारांची भर घालू , त्यामुळे दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना 13 हजारांऐवजी 15 हजार रुपये मिळतील.
तसेच , नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता खरीप हंगामापूर्वीच देऊ अशी आश्वासने दिली होती. मात्र, या आश्वासनाविषयी राज्य सरकारच्या पातळीवर कोणतीही हालचाल दिसून येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Namo Kisan Hapta 2025 नमो शेतकरी सन्मान योजनेचा एप्रिल ते जुलै या कालावधीतील सातवा आता जून महिन्यातच मिळणार होता. मान्सूनने राज्यात दमदार हजेरी लावल्यानंतर शेतकरी आता पेरण्यांच्या कामात वेगळे झाले आहेत.
बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी नमो शेतकरी सन्मान योजनेतील हफ्त्यांचे पैसे कामे येतील, असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र, अद्यापही या योजनेच्या हप्त्यांविषयी स्पष्टता झालेली नाही.
या योजनेतील शेतकऱ्यांना वर्षासाठी तीन हजार रुपयांची वाढ करावी लागणार असल्याने यासाठीची तीन हजार कोटींची तरतूद नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही.
Namo Kisan Hapta 2025 त्यामुळे राज्य सरकारवर पडणारा हा अतिरिक्त तीन हजार कोटींचा भार कसा वर्ग केला जाईल, याकडे कृषी विभागाचे लक्ष लागून आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी 93 लाख 7 हजार 721 शेतकरी पात्र ठरले आहेत.
यात ॲग्रीस्टॅक योजनेतील शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आलेला नाही. याबाबत राज्य सरकारने अद्याप सूचना दिलेली नाही, त्यामुळे सूचना आल्यानंतर केवळ ॲग्रीस्टॅक ओळख क्रमांक असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता दिला जाईल, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.
राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएम किसान योजनेच्या धरतीवर नमो शेतकरी सन्मान योजना अंतर्गत 6 ऐवजी 9 हजार रुपये प्रत्येकी देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता अद्याप झाली नाही.
Namo Kisan Hapta 2025 हप्त्याकरीता जिल्हानिहाय पात्र शेतकरी संख्या
अहिल्यानगर | 5 लाख 51 हजार 519 |
अकोला | 1 लाख 90 हजार 471 |
अमरावती | 2 लाख 74 हजार 642 |
छत्रपती संभाजी नगर | 3 लाख 46 हजार 850 |
बीड | 3 लाख 79 हजार 817 |
भंडारा | 2 लाख 19 हजार 382 |
चंद्रपूर | 2 लाख 50 हजार 638 |
धुळे | 1 लाख 57 हजार 742 |
गडचिरोली | 1 लाख 52 हजार 972 |
गोंदिया | 2 लाख 23 हजार 160 |
हिंगोली | 1 लाख 77 हजार 74 |
जळगाव | 4 लाख 8 हजार 621 |
जालना | 3 लाख 1 हजार 42 |
कोल्हापूर | 4 लाख 84 हजार |
लातूर | 2 लाख 72 हजार 495 |
नागपूर | 1 लाख 81 हजार 65 |
नांदेड | 3 लाख 85 हजार 637 |
नंदुरबार | 1 लाख 5 हजार 411 |
नाशिक | 4 लाख 41 हजार 803 |
धाराशिव | 2 लाख 37 हजार 72 |
पालघर | 1 लाख 159 |
परभणी | 2 लाख 51 हजार 857 |
पुणे | 4 लाख 46 हजार 24 |
रायगड | 1 लाख 17 हजार 638 |
रत्नागिरी | 1 लाख 58 हजार 998 |
सांगली | 3 लाख 99 हजार 422 |
सातारा | 4 लाख 52 हजार 483 |
सिंधुदुर्ग | 1 लाख 22 हजार 637 |
सोलापूर | 5 लाख 4 हजार 175 |
ठाणे | 74 लाख 278 |
वर्धा | 1 लाख 31 हजार 3 |
वाशिम | 1 लाख 67 हजार 708 |
यवतमाळ | 2 लाख 94 हजार 48 |
एकूण | 93 लाख 7 हजार 721 |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |