मराठवाड्यात 3 दिवस वादळी पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का? वाचा सविस्तर; Marathwada Weather Alert 2025

Marathwada Weather Alert 2025 मराठवाड्यात गेल्या काही काळात वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. येत्या 24 तासात पुन्हा पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या भागात अलर्ट जारी केला आहे.

Marathwada Weather Alert 2025

मराठवाड्यातील बहुदांशर भागात ढगाळ वातावरणासोबत यांची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बियाणे गुणवत्ता, खतांची साठेबाजी व लिंकिंग यासाठी कृषी विभागाकडे कशी कराल तक्रार?

विशेषतः लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड या भागात जोरदार पावसाची शक्यता असून राहावे असा इशारा देण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई (IMD) ने 27 मे 31 मे या कालावधीत मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वारा मेघगर्जना आणि हलक्यातील मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या या अंदाजामुळे शेतकरी नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठवाड्यात आज (27 मे) रोजी छत्रपती संभाजी नगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक भागात वादळी वारा (वेग 40 ते 50 किमी/ता.) ने मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर लातूर, धाराशिव जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाट पावसाची शक्यता आहे.

Marathwada Weather Alert 2025 उद्या (28 मे) रोजी हिंगोली नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, लातूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now

29 मे (गुरुवार) रोजी हिंगोली, नांदेड, संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

29 ते 31 मे दरम्यान संपूर्ण मराठवाडा विभागातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Marathwada Weather Alert 2025 शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसात वाऱ्याचा वेग आणि विजेच्या कडकडाट असं पाऊस होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे.

  • शेतातील उघड्यावर ठेवलेला शेतमाल कोरड्या आणि सुरक्षित जागी ठेवावा.
  • आंबा, लिंबू, डाळिंब यांसारख्या फळबागांना वाऱ्यापासून झेरॉक्स संरक्षण द्यावे.
  • तातडीचे फवारणी व मशागत टाळावी.
  • तात्पुरत्या स्वरूपात पेरणी करणे टाळावे.
  • पशुधनाच्या सुरक्षतेसाठी व्यवस्था करावी.
  • आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासन सज्ज.
  • हवामानाचा सतत आढावा घ्या.
  • शासनाच्या संदेशावर विश्वास ठेवा, अफवांपासून दूर राहा.
  • अत्यावश्यक नसल्यास नजीकच्या तहसील किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठवाड्यातील स्थानिक प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि कृषी विभागांनी ही परिस्थितीवर लक्ष ठेवले असून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अतिवृष्टी वीज कोसळणे व झाडे पडण्याचा घटनांची शक्यता लक्षात घेता सर्व संबंधित विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment