राज्यात मुसळधार पाऊस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला पावसाचा रेड सिग्नल वाचा सविस्तर; Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 राज्यात मान्सूनने जोर धरला असून मुंबई, कोकण व पुणे सह, रायगड मध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागात रस्ते जलमय झाले असून, सिंधुदुर्गात एक जण नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Maharashtra Weather Update 2025

IMD ने पुढील पाच दिवसांचा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात मान्सूनने आता खऱ्या अर्थाने जोर धरला आहे. विशेषतः कोकण, मुंबई, पुणे आणि रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात जोरदार ते मुसळधार पावसाची नोंद झाली.

विदर्भातील ‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता, उर्वरित भागात कसा असेल पाऊस?

Maharashtra Weather Update 2025 कोकणासह विदर्भात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now

Maharashtra Weather Update 2025 पुणे, रायगड मध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस…

पुणे आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आज 24 जून रोजी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्यात मागील दोन दिवसांपासून रिमझिम स्वरूपाचा पाऊस होत होता. मात्र, आज सकाळी पासून पावसाचा जोर अचानक वाढला.

रायगड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून आलेल्या मुसळधार पावसामुळे अलिबाग, मुरुड, पेन, माणगाव, रोहा आदी तालुक्यातील सखल भागात पाणी साचले आहे. वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

Maharashtra Weather Update 2025 कोकण-विदर्भात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मोसमी पावसाने सक्रियतीने हजेरी लावली आहे. कोकण आणि विदर्भ विभागातील पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now

रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update 2025 मुंबईत अलर्ट कायम

मुंबईत मागील दोन-तीन दिवसात पावसाचा जोर कमी झालेला दिसतो आहे. सोमवारी सकाळी 08.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत कुलाबा आणि सांताक्रुज केंद्रात अनुक्रमे 6 मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, हवामान खात्याने मुंबईसाठीही अलर्ट जारी केला आहे.

सावधान! नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचना पाळाव्यात…

हवामान विभागाने (IMD) दिलेल्या सूचनेनुसार नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा.

जलाशय, नद्या, ओढे यांपासून दूर राहावे. तसेच घरात सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे.

पावसामुळे अनेक भागात दरड कोसळण्याचा, विद्युत पुरवठा खंडित होण्याचा, आणि वाहतुकीत अडथळा निर्माण होण्याचा संभव असल्याने यंत्रणांनी सतर्कता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

  • जास्त पाऊस झाला शेतीतील अतिरिक्त पाणी काढून टाकण्यासाठी निचरा व्यवस्था ठेवा, विशेषतः भात सोयाबीन व मका पिकांमध्ये पाणी व्यवस्थापन करा.
  • बीज साठवून योग्य पद्धतीने करा आद्रते पासून संरक्षण द्या
  • मुसळधार पावसात माती वाहून जाऊ नये म्हणून बांध मजबूत करा.
  • हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी कोकण किनारपट्टीवर मुसळधार प्रवाह, जोरदार वारे व समुद्र खवळलेला राहील. असा अंदाज दिला आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचे निर्देश पाळावे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment