Maharashtra Weather Update 2025 राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून आज (6 जून) रोजी हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी जारी केला आहे.

काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा जोर पाहायला मिळणार आहे.
मान्सून स्पेशल मराठवाड्याचे धरण भरभरून, जाणून घ्या उपलब्ध पाणीसाठा किती?
IMD (आयएमडी) ने दिलेल्या माहितीनुसार, आज (6 जून) रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 25 पेक्षा अधिक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update 2025 मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता!
- मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण आहे. दुपारी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
- त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
Maharashtra Weather Update 2025 पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस
- सातारा आणि पुणे जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
- सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, पावसासह वाऱ्याचा वेगळी अधिक राहील असा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रात वादळीवाऱ्यांसह बरसणार
- नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये येत्या दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
- जळगाव, धुळे आणि नंदुरबार मध्ये विजांच्या कडकडाट असं हलक्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात विजेचा कडकडाट
- छत्रपती संभाजी नगर, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
- बीड, परभणी, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Weather Update 2025 विदर्भात वाऱ्याचा वेग वाढणार
नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
या भागांमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील.
तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला!
- विजांच्या कडकडाट्याच्या वेळी घरातच थांबा.
- शेती कामासाठी योग्य नियोजन करा.
- पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहा, असा सल्ला देण्यात आला आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |