Maharashtra Weather Update 2025 मे महिन्यात पावसाची दमदार हजेरी लावल्यानंतर काही दिवसांची विश्रांती घेतलेल्या मान्सून पुन्हा जोमात येण्याची शक्यता आहे. राज्यात येत्या तीन दिवसात पुन्हा वादळी वाऱ्यांसह, विजांच्या कडकडाट पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवावून विभागाने दिला आहे.

मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगरसह तब्बल 30 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तुर बाजार भाव अपडेट, तुमच्या भागात तुरीला किती दर? वाचा सविस्तर;
राज्यातील हवामान पुन्हा एकदा बदलण्याची चिन्ह आहेत. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यांसह, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसात राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला होता. मान्सूनची गती मंदावल्याने पावसाला उघडीप मिळाली होती. मात्र, आता पुन्हा हवामान बदलत असून, राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण आणि तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहेत.
Maharashtra Weather Update 2025 कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट?
हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
कोकण | मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी |
मध्य महाराष्ट्र | पुणे (घाटमाथ्यासह), नाशिक, जळगाव, धुळे, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर |
मराठवाडा | छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, धाराशिव |
विदर्भ | नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा |
Maharashtra Weather Update 2025 पावसामागील कारण आहे तरी काय….
सध्या गुजरातच्या वरच्या भागात आणि बांगलादेशच्या उत्तर भागात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हवामानात अस्थिरता असून त्याचा थेट प्रभाव महाराष्ट्रावर पडतो आहे.
अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरामधील मान्सूनचा प्रभाव सध्या स्थिरावलेला असून पुढे सरकण्याची प्रतीक्षा सुरू आहे.
कधी आणि कसं होईल पाऊस?
- संध्याकाळी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता जास्त आहे.
- सकाळी उन्हाचे दर्शन नंतर अचानक हवामान विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस अशी स्थिती राहील.
- काही भागात ताशी 30-40 किलो मीटर वेगाने वारे वाहू शकतात.
Maharashtra Weather Update 2025 शेतकऱ्यांना सल्ला!
- शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.
- उघड्यावर काम करताना विजांचा धोका टाळावा.
- विजेच्या कडकडाटाचा झाडांच्या खाली किंवा उघड्यावर थांबू नये.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |