Maharashtra Weather Update 2025 राज्यात लवकर दाखल झालेल्या मान्सून ने सुरुवातीला जोरदार हजेरी लावली. मात्र, आता पावसाचा जोर ओसरतोय. काही जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर काही ठिकाणी पेरण्या थांबवण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

राज्यात यंदा मान्सून वेळेआधी दाखल झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच पावसाचा जोर अनुभवायला आला मिळाला. मात्र आता हवामान खात्याने (IMD) ने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सूनची तीव्रता कमी होणार असून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्हा परिषदेकडून 50 टक्के अनुदानावर बियाणे विक्री, असा करा अर्ज!
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या प्रगतीसाठी वातावरण नाही. मात्र, 12 जून नंतर संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update 2025 विदर्भात यलो अलर्ट
विदर्भात (31 मे) रोजी विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने जारी करण्यात केला आहे. तेथील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उर्वरित राज्यात हलक्या सरींचा अंदाज
राज्यातील इतर भागात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या विस्तारित अंदाजानुसार 1 ते 5 जून दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणार आहे.
12 जून नंतर पुन्हा सक्रिय होणार मान्सून
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण नाही. मात्र, 12 जून नंतर संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Update 2025 शेतकऱ्यांसाठी सल्ला!
हवामान परिषदेत लक्षात घेता, कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला दिला आहे.
जमिनीत अद्याप पावसाचा वापसा पुरेसा नसल्यामुळे पेरणी केल्यास बीज व खतांचा अपयव्य होण्याची शक्यता आहे.
पूर्व मशागतीची कामे पूर्ण करून ठेवावी ठेवावीत असा सल्ला देण्यात आला आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |