Maharashtra Weather Update 2025 महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, 25 मे रोजी संपूर्ण राज्याला ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी ची दिलासदायक बातमी आहे. केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, बंगालच्या उपसागरातील शाखाही सक्रिय झाली आहे. त्या बाजूनेही मान्सून पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.
चक्रीवादळ ‘शक्ती’चा धोका, IMD ने जारी केला हाय अलर्ट! वाचा सविस्तर;
विजांच्या कडकडाटसह येणारा हा पाऊस जनजीवन विस्कळीत करू शकतो, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Weather Update 2025 अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्याचे काल 23 मे रोजी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले आहे. मात्र, अजून त्याचे चक्रीवादळात रुपांतर झालेले नाही. या स्थितीमुळे दक्षिण कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे राज्यात 24 ते 28 मे पर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
प्रामुख्याने उद्या रविवार (25 मे) रोजी अवघ्या राज्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारी (23 मे) रोजी दक्षिण कोकण किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र आणि किती स्वरूपात परिवर्तित झाले. ते येत्या 24 तासांमध्ये उत्तरेकडे सरकणार आहेत.
कोकण किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे मोठे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि उत्तर तेलंगण ओलांडून दक्षिण छत्तीसगड पर्यंत पावसाचा जोर जास्त राहणार आहे.
मान्सूनचा जोर केरळ मार्गे
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये मान्सून दोन दिवसात दाखल होईल. साधारण 25 मे पर्यंत दरम्यान केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील शाखाही सक्रिय झाली आहे. त्या बाजूनेही मान्सून पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.
Maharashtra Weather Update 2025 राज्यात उद्या (25 मे) रोजी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे.
पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. मात्र, रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या 48 तासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे.
पुढचे दोन दिवस पाऊस सुरूच राहील, असा अंदाज वर्तविला आहे. राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिक व नाशिकच्या घाटमाथ्यावरही जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Maharashtra Weather Update 2025 कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
कोकण विभाग | रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होणार आहे. |
मध्य महाराष्ट्र | पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस. पुणे आणि कोल्हापूरच्या घाट माथ्यावर विशेषतः पावसाचा जोर राहणार आहे. |
मराठवाडा | संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव, जालना, हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता. |
विदर्भ | अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आदी जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. |
उत्तर महाराष्ट्र | नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात हे पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. |
Maharashtra Weather Update 2025 शेतकऱ्यांना सल्ला!
हवामान विभागाने नागरिकांसह शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे वाहतूक आणि जन जीवनावर परिणाम होऊ शकतो.
शेतकऱ्यांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजांच्या कडकडाटा दरम्यान झाडाखाली किंवा विद्युत खांबाजवळ उभे राहू नये.
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
इतर माहीतीसाठी | येथे क्लिक करा |