उकाड्यापासून तूर्तास सुटका नाही; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर…Maharashtra Weather 2025

Maharashtra Weather 2025 महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून उकाड्याला सुरुवात झाली असून, आता ही उष्णतेची लाट आणखी तीव्र होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Maharashtra Weather 2025

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये मंगळवारचा दिवस यंदाच्या वर्षातील उष्ण दिवस ठरला. मुंबईत कुलाबा येथे मंगळवारी 38 अंश सेल्सिअस तर, सांताक्रुज येथे 39 अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली.

IMD (आयएमडी) ने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. या वाढत्या तापमानाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. येत्या 24 तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला नसला तरीही वातावरण मात्र उष्ण आणि दमट राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

शेतकऱ्याचा फंडा भारी, उसाच्या शेतात घेतलं आंतरपीक, 3 महिन्यात दीड लाख कमाई; वाचा सविस्तर…

कोकण किनारपट्टीसह ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना मागील 48 तासात उष्णतेच्या इशारा देण्यात आला होता. त्यानंतर येथील भागात हवा उष्ण आणि दमट असेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

विदर्भात ही परिस्थिती वेगळी नाही. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागात उष्णता तीव्र होत असून, तापमानाचा पारा सुद्धा 37 अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना इतक्यात तरी या उष्णतेपासून दिलासा मिळणार नाही. दुपारी 12 ते 4 या वेळेचा उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now

Maharashtra Weather 2025 शेतकऱ्यांसाठी सल्ला

  • काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी पिकाची काढणी मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून साठवणूक करावी.
  • वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून साठवणूक करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment