Krishna River Project 2025 18 वर्षापासून रखडलेला टप्पा 6 अखेर राजकीय प्राधान्याच्या प्रशिक्षित. मराठवाडाच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जीवनरेषा ठरू शकणार हा टप्पा सरकारच्या दुर्लक्षामुळे अंधारात आहे.

अनिल जगताप यांची मागणी ही स्थानिक शेतकऱ्यांच्या भावनांची व दैनंदिन वास्तवाची तीव्र अभिव्यक्ती आहे. राज्य शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, ही जनतेची अपेक्षा आहे.
महसूल खात्यात निर्णयांचा धडाका, घेतले ‘हे’ अठरा महत्त्वपूर्ण निर्णय! जाणून घ्या सविस्तर;
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील सहाव्या टप्पा अद्यापही प्राधान्य यादीत न घेतल्यामुळे स्थानिक शेतकरी संतप्त आहेत.

Krishna River Project 2025 या टप्प्याच्या कामासाठी निविदा प्रक्रियाही अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे या टप्प्याचे काम कधी सुरू होईल याबाबतही संभ्रमाचे वातावरण आहे.
सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी नुकतीच ही बाब राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून देत तातडीने टप्पा सहावाचा समावेश प्राधान्य यादीत करावा, अशी मागणी केली आहे.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या सहाव्या टप्प्याची निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी तातडीची गरज आहे. राजकीय इच्छाशक्ती अभावी हे काम वर्षानुवर्षी लांबले जात आहे. राज्य शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
Krishna River Project 2025 टप्पा 6 मध्ये कोणकोणते भाग
तुळजापूर लोहारा उमरगा तालुके.
लोहारा तालुक्यातील माळेगाव बिलासपूर पांढरी येथून पाणी नेऊन उमरगातील तुरोरी येथे पोहोचवण्याची योजना आहे.
प्रकल्प मंजुरी व सिंचन क्षेत्र
23 ऑगस्ट 2017 रोजी प्रकल्पात शासन मान्यता मिळाली.
धाराशिव जिल्ह्यातील -25798 हेक्टर
बीड जिल्ह्यातील -8,147 हेक्टर
एकूण सिंचन क्षेत्र -33,945 हेक्टर
18 वर्षात केवळ 5 टप्पे
टप्पा 1 ते 5 पर्यंतचे काम पूर्ण झाले असून, रामदारा, ता. तुळजापूर येथे पाणी पोहोचले आहे.
पण टप्पा 6 रखडलेला आहे. या टप्प्याची निविदा प्रक्रियेचाही प्रारंभ झाला नाही.
प्रकल्प खर्चात 6 ते 10 पट वाढ…
वर्ष | अंदाजित खर्च (कोटी रुपयांमध्ये) |
2007 | 2,382.50 कोटी (मूळ) |
2009 | 4,210.59 कोटी (प्रथम सुधारित) |
2022 | 11,726.91 कोटी (द्वितीय सुधारित) |
भूसंपादन, पर्यावरण ,पूल बांधणी, दळणवळण व्यवस्था, वृक्षारोपण आदी घटकांमुळे खर्चात प्रचंड वाढ झाली आहे.
Krishna River Project 2025 माहिती अधिकारातून खुलासा!
अनिल जगताप यांनी माहिती अधिकाराकडून मिळवलेल्या दस्ताऐवजांच्या आधारे शासनाच्या दुर्लक्षाचे अनेक मुद्दे समोर आणले आहेत.
किती वर्ष लागणार? शेतकऱ्यांचा प्रश्न!!
18 वर्षात केवळ पाच टक्के पूर्ण.
टप्पा 6 रखडल्याने तुळजापूर, लोहारा, उमरगायातील हजारो शेतकऱ्यांचे भवितव्य अंधारात.
दरवर्षी समुद्रात वाहून जाणारे कृष्णाचे 40 टीएमसी पाणी जर या भागात वळवले गेले तर, दुष्काळाचा प्रश्न कायमचा सुटू शकतो.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |