Kharip Perni 2025 सोलापूर : 4 जून रोजी जिल्ह्यात दमदार पावसाने पावसाळ्याची सुरुवात झाली होती. 4 जून रोजी जिल्ह्यात एकूण 13 तर पाच जून रोजी 14 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यंदा मी व जून महिन्यात 4 जून पर्यंत 237.7 मि.मी. पाऊस पडला आहे.

मागील वर्षी 4 जून रोजी कडक उन्हाचे रूपांतर पावसाचे ढग जमवण्यात झाले व त्याच दिवशी सायंकाळ नंतर पावसाला सुरुवात झाली.
जमिनीची सुपीकता वाढवायची ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष…!
एक-दोन तालुके वगळता कमी अधिक प्रमाणात इतर तालुक्यात 4 जून रोजी 13 मि.मी. पाऊस पडला होता. त्यानंतर सलग 12 दिवस दररोज चांगला पाऊस पडत होता.

बिगर मोसमी पावसाने विश्रांती घेतात सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पीक पेरणीसाठी जाड्यावर मूठ धरली आहे.
यंदाही शेतकऱ्यांनी बाजरीपेक्षा मका पेरणीला अधिक प्राधान्य दिल्याचे पेरणी झालेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी रविवार पर्यंत सुमारे 5,750 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी उरकून घेतली आहे.
यावर्षी 13 मे ते 30 मे पर्यंत 17 दिवस जिल्हाभरात भरपूर म्हणजे काय 233 मि.मी. पाऊस पडला आहे. जून महिन्यात अवघा 1.4 मि.मी. इतका पाऊस पडला असला तरी मे व जून महिन्याचा एकूण पाऊस 234.7 मि.मी. इतका झाला आहे.
Kharip Perni 2025 खरीप पेरणीला सुरुवात….
दमदार पावसामुळे जमिनीत झालेल्या ओढीमुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली आहे. उडीद पेरणीवर शेतकऱ्यांचा भर असल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षी जिल्ह्यात सोयाबीन मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली होती.
मात्र सोयाबीनचा बाजार वर्षभरात सावरला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन पेरणी विषयी दुय्यम स्थान आहे. खरीप पेरणीची सुरुवात जिल्ह्यात झाली असली तरी कृषी खात्याकडे त्याची नोंद नाही.
Kharip Perni 2025 वाफसा येताच पेरणीला सुरुवात…
- यंदा उन्हाळ्यातच मान्सून पूर्व बिगर मौसमी मुसळधार अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने हवामान खात्याचे अंदाज फोल ठरले.
- Kharip Perni 2025 गेल्या 13 दिवसात तालुक्यातील मंडळ निहाय सरासरी 120 मि.मी. पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगाम पीक पेरणीचा वेध लागले होते. कधी एकदाच पाऊस विश्रांती घेतो याची शेतकरी वाट पाहत होता.
- गेल्या तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे जमिनीत वाफसा शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर यांत्रिकी तसेच बैल करवी खरिपाच्या पेरणीसाठी सुरुवात केली आहे.
“तालुक्यात ज्या भागात पेरणी योग्य चांगला पाऊस झाला आहे. अशा ठिकाणी बाजरी, मका, तूर आधी पीक पेरणी करावी. पाऊस लांबलाच तर बाजरी पीक तग धरू शकते, मका तग धरू शकत नाही. त्यामुळे शक्यतो संरक्षित पाण्याची उपलब्धता असेल तेथे मका पेरणी करावी. – दिपाली जाधव, तालुका कृषी, अधिकारी सांगोला”
इतर शेतीविषयक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
बियाणे अनुदानासाठी महाडीबीटीच्या वेबसाईटला भेट द्या : | येथे क्लिक करा |