Kharif Season 2025 शेती करताना किड नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर अपरिहार्य असतो. मात्र त्याचा वापर करताना शेतकऱ्यांनी ती काळजी घेतली नाही, तर त्याचे दुष्परिणाम आरोग्यावर होऊ शकतात.

अनेकदा फवारणी करताना साध्या चुकांमुळे विषबाधा होऊन अपघात किंवा आजार उद्भवतात. त्यामुळे कीटकनाशके फवारण्यापूर्वी फवारताना आणि फवारणी नंतर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्याच्या आवश्यक आहे.
पीएम किसानचा पुढील हप्ता ‘या’ तारखेनंतर मिळण्याची शक्यता, वाचा सविस्तर;
Kharif Season 2025 फवारणी करण्याआधी वापरण्यात येणाऱ्या रसायनाच्या बाटली वरील लेबल, सूचना पत्रक नीट वाचावे. त्या प्रत्येक रसायनाच्या विषारीपणाची पातळी वेगळी असते. यासाठी बाटल्यांवर लाल, पिवळा, निळा आणि हिरवा अशा रंगाचे त्रिकोणी चिन्ह असते. लाल रंग हे अत्यंत विषारी रसायन दर्शवते. या रंगाच्या आधारे निरक्षर व्यक्तीलाही त्या कीटकनाशकाचे स्वरूप लक्षात येते.

फवारणीसाठी वापरण्यात येणारे यंत्र हे योग्य स्थितीत असावे. पंपाचे नोझल गळके असले तर त्याचा वापर करणे टाळावे., तणनाशकासाठी वापरलेला पंप कीटकनाशकात वापरू नये. मिश्रण तयार करताना सुरुवातीला थोड्या प्रमाणात पाण्यात भुकटी मिसळून मग गरजेनुसार पाणी टाकावे. हे करताना हातात हात मोजे व तोंडाला मास्क लावणे आवश्यक असते. शरीर झाकलेले राहिल अशा प्रकारचे कपडे वापरावेत. डोक्यावर कापड, पायात बूट आणि पूर्ण बाह्यांचे शर्ट पायमल पायजमा वापरणे फायदेशीर ठरते.
Kharif Season 2025 फवारणी करताना वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी. पावसाच्या वेळी किंवा पाऊस होण्याच्या शक्यता असताना फवारणी करू नये. फवारणीनंतर लगेच शेतात प्रवेश करणे टाळावे. फवारणी करत असताना खाणे पिणे किंवा धूम्रपान करणे टाळावे. एक दिवसात सलग आठ तासांपेक्षा जास्त फवारणीचे काम करू नये आणि उपाशी पोटी फवारणी करणे आरोग्य दृष्टीने धोकादायक असते. सकाळी न्याहारीनंतरच हे काम करावे.
फवारणी झाल्यावर हात पाय चेहरा आणि इतर अंगात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावा. वापरलेले कपडे वेगळे ठेवावे ठेवावेत. वापरलेले साहित्य स्वच्छ करून सुकवून सुरक्षित स्थळी ठेवावे. हे साहित्य विहीरी नदी किंवा ओढ्याजवळ धुण्या टाळावे. वापरलेले पाणी पडीक जागी टाकावे. रिकाम्या बाटल्या जमिनीत पुराव्यात.
Kharif Season 2025 विषबाधा झाल्यास थोड्याच वेळात काही लक्षणे दिसून येतात….
जसे की चक्कर येणे, उलटी होणे, डोळ्यातून पाणी येणे, अंगावर चट्टे उठवणे, डोळे अंधुक दिसणे, स्नायू मध्ये वेदना होणे, किंवा बेशुद्ध होणे.
Kharif Season 2025 अशी लक्षणे दिसतात रुग्णास त्वरित नजिकच्या दवाखान्यात नेणे आवश्यक आहे. डॉक्टरांना नेमके कोणते कीटकनाशक वापरले गेले होते, किती प्रमाणात आणि किती वेळापूर्वी हे घडले, याची माहिती दिल्यास उपचार अधिक योग्य प्रकारे करता येतात.
विषबाधा झाल्यावर रुग्ण पूर्ण शुद्धीत असेल तरच त्यातला त्याला उलटी करण्यास प्रवृत्त करावे. अन्यथा तसे करू नये. कधीकधी प्राथमिक उपचार म्हणून कोळशाची भुकटी पाण्यात मिसळून दिली जाते. परंतु हेही डॉक्टरच्या मार्गदर्शनानुसारच करावे.
शेतीच्या आधुनिक काळात रसायनांचा वापर अपरिहार्य असला तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेणे हे शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने कीटकनाशक वापरताना योग्य ती दक्षता घ्यावी, यासाठीच ही माहिती सर्वांना समजून घेणे गरजेचे आहे. – युवराज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |