Kharif Season 2025 साधारणपणे मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात पारंपारिक पद्धतीने जमिनीची मशागत करतात. बीज अंकुरण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा असल्याने जमिनीच्या नैसर्गिक आद्रतेच्या उपयोग करून राब भाजणी केली जाते. मात्र, मे महिन्यातील पंधरवड्यातच अवकाळी पाऊस झाल्याने जमिनीत ओलावा निर्माण झाला.

त्यामुळे मशागतपूर्व कामांना खिळ बसली. शेतकऱ्यांना खरीप हंगामातील धुळवाफे पेरणी करता आली नाही. त्यामुळे खरीप पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी अडचणीत आला आहे. अवकाळी पाऊस आणि त्यानंतर सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले.
‘एक रुपयात पिक विमा’ बंद झाल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या दरवर्षी वाट्याला 700 कोटींपेक्षा अधिक भुर्दंड!
Kharif Season 2025 मे महिन्यात नांगरणी, कुळवणी गवत काढणे आणि खतांची पूर्वतयारी केली जाते. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पावसामुळे भिजले असल्याने यंदा हे काम वेळेवर होत नाही आहे. परिणामी वाफसा धरण्यास लागणारा वेळ वाढला असून जूनच्या सुरुवातीस पेरणी करण्याची अडचण निर्माण झाली आहे.

Kharif Season 2025 कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, मालेगाव तालुक्यात खरीप हंगामात अंदाजे हेक्टर क्षेत्रावर शेती केली जाणार आहे. खरीप मका जवळपास 38 हजार 850 हेक्टर क्षेत्रावर तर बाजरीचे 26 हजार 700 हेक्टर क्षेत्र तसेच कापूस 25हजार 798 हेक्टर क्षेत्र लागवडीचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे भुईमुगाची पेरणी 1 हजार 236 हेक्टर क्षेत्रावर होण्याचा अंदाज आहे.
वेळेवर पेरणी न झाल्यास या सर्व पिकांच्या उत्पादनात घट येऊ शकते. विशेषतः डाळिंब कापूस व भुईमूग पिकांसाठी 10 ते 25 जून हा आदर्श पेरणी कालावधी मानला जातो. यामध्ये उशीर झाला तर उत्पादनात 15 ते 30 टक्के घट होण्याची शक्यता आहे.
पावसामुळे जमिनीत ओलावा आहे, पण मशागत नाही. मशीन घेतली तरी चिखलात जाऊ शकत नाही. जून मधल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत काम पूर्ण होईल का याची शंका आहे. – विजय घोडके, शेतकरी
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |