Kanda Bajarbhav 2025 देशभरातील कांदा उत्पादक शेतकरी उत्पादनांच्या किमतीवरून नाराज आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांना अनेक महिन्यांपासून कांद्याचे योग्य भाव मिळत नाहीत.

Kanda Bajarbhav 2025 बुधवार 4 जून रोजी मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील अलोटा मंडी मध्ये कांदा पन्नास रुपये प्रति क्विंटल म्हणजेच 50 पैसे प्रति किलो दराने विकला गेला. सेंद्रिय कांदे देखील दोन-तीन रुपये प्रति किलो दराने विकले गेले दरा.
सोलापूर जिल्ह्यात खरीप पेरणीला सुरुवात, कोणत्या पिकाला शेतकऱ्यांची पसंती?
Kanda Bajarbhav 2025 काल पुन्हा मध्य प्रदेशातील आलोटा मंडी मध्ये कांद्याची किमान किंमत पन्नास रुपये प्रतिक्विंटल नोंदवण्यात आली. तर सरासरी किंमत 341 रुपये किती क्विंटल होती. केवळ बडवा आणि बाजारामध्ये कांद्याची जास्तीत जास्त किंमत 1500 रुपये प्रतिक्विंटल नोंदवण्यात आली.

Kanda Bajarbhav 2025 तर महाराष्ट्रात काल पाच जून रोजी भुसावळ बाजारात कमीत कमी 900 रुपये सरासरी 1100 रुपये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कमीत कमी 200 रुपये सरासरी 600 रुपये, देवळा बाजारात कमीत कमी 150 रुपये सरासरी 1400 रुपये, कर्जत बाजारात कमीत कमी 200 रुपये, सरासरी 800 रुपये पिंपळगाव बाजारात कमीत कमी 650 रुपये तर सरासरी 1550 रुपये, सोलापूर बाजारात कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 01 हजार रुपये आणि येवला बाजारात कमीत कमी 100 रुपये तर सरासरी 1100 रुपयांचा दर मिळाला.
तसेच मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याच्या उभ्या पिकाचे आणि कापणी केलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बाधित शेतकरी राज्य सरकारकडून भरपाईची मागणी करत आहेत. तसेच ते नाफेडच्या कांदा, खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्र बरोबर मध्यप्रदेशातील बाजारपेठेत कांद्याचे किमतीची तिथी ही वाईट होत चालली आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |