जमिनीची सुपीकता वाढवायची ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष…! Jaminichi Supikta 2025

Jaminichi Supikta 2025 धुळे : जमिनीतून मिळणाऱ्या पिकांचे उत्पादन हे दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामागील प्रमुख कारणांपैकी एक कारण म्हणजे जमिनीची सुपीकता कमी होणे जमिनीची सुपीकता कमी होणे, म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होणे आहे. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे आवश्यक झाले आहे.

Jaminichi Supikta 2025

सध्या खरिपाची तयारी शेतकऱ्यांकडून सुरू असताना जमिनीची सुपीकता वाळवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांकडे लक्ष देण्याची गरज आहे. सेंद्रिय खतांच्या वापराच्या वाढीसाठी अनेक माध्यमातुन प्रोत्साहन मिळत असताना याचा देखील उपयोग शेतकऱ्यांनी करून घेत जमिनीची सुपीकता वाढीसाठी मदत करून घ्यावी यातून उत्पन्न देखील वाढीस मदत होणार आहे.

सोयाबीन उत्पादन वाढीसाठी पेरणी अगोदर करायला विसरू नका या 10 गोष्टी, वाचा सविस्तर;

Jaminichi Supikta 2025 काय उपाययोजना कराव्यात?

  • जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवणे अत्यंत आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now

  • त्यासाठी हिरवळीच्या खतांची पेरणी करणे, हिरवळीचे खते जसे बोरू, ताग, डेबा, गिरीपुष्प, मूग पांची पेरणी करून घ्यावी.

  • पीक फुलोरा येण्याच्या आधी अर्थातच 30 ते 45 दिवसांच्या दरम्यान जमिनीत ट्रॅक्टरने नांगरणी करून जमिनीत गाडून द्यावे, त्यामुळे जमिनीत पुढील पिकांसाठी नत्र, सफुरद, पालाश ही अन्नद्रव्य उपलब्ध होतील.

  • याशिवाय हिरवळीच्या पिकांचे अवशेष जमिनीत कुजत असताना सूक्ष्मजीवांच्या निर्मितीस चालना मिळून त्यापासून पोषण सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते, पर्यायाने जमिनीची प्रत सुधारते. यातून शेतकऱ्यांना फायदा होण्यास मदत होत असल्याचे दिसून येते.

Jaminichi Supikta 2025 सेंद्रिय कर्बाचे प्रमाण

वाढवण्यासाठी गांडूळ खताचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांकडे शेड उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी गांडूळ खत तयार करून साठवणूक करावी व पेरणीवेळी त्याचा वापर करावा. – अविनाश कुवर, कृषी सहाय्यक

WhatsApp Group Join Now

Jaminichi Supikta 2025 सेंद्रिय कर्बाचे महत्त्व काय?

सद्य परिस्थिती शेतकऱ्यांमध्ये शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत हे शेतात टाकण्याचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे, तसेच त्यांची उपलब्धता कमी असल्यामुळे, शिवाय ते महाग असल्यामुळे शेतकऱ्याचे शेणखत गांडूळ खत, कंपोस्ट खत हे शेतात राखण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत झाले आहे. हे त्यामुळे अमिनेतील सेंद्रिय कर्ब कमी होऊन सुपीकता कमी होत आहे.

जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणे

सेंद्रिय कर्ब कमी होणे, अमिनीतील पोषक तत्वे कमी होणे आणि रासायनिक खतांचा अति वापर करणे, जंगल तोड, मातीची झीज, अति चराई आणि खराब पाणी व्यवस्थापन, खराब मातीची रचना, एकच पीक घेणे आधी करणे जमिनीची सुपीकता कमी करतात. या बाबींकडे शेतकऱ्यांनी लक्ष देऊन नियोजनाची गरज आहे.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment