सततच्या पावसाने द्राक्ष बागांवर परिणाम द्राक्ष संशोधकांचा काय सल्ला, वाचा सविस्तर; Draksh Bag Update 2025

Draksh Bag Update 2025 गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या पावसाळ्यात द्राक्ष बागांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी त्यामुळे कमालीचे हवालदिल झाले आहेत.

Draksh Bag Update 2025

नाशिक सांगली नंतर द्राक्ष उत्पादनात सोलापूर जिल्ह्याचा नंबर लागतो. या पावसाने द्राक्ष शेतीवर संकटाची गडद छाया पसरली आहे. या पावसाने द्राक्ष उत्पादनात मोठी घट होऊ शकते.

जमिनीची सुपीकता वाढवायची ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष…!

काडी परिपक्व व होणार नसल्याने द्राक्ष वेलींची वाढ खुंटणार आहे. सध्याच्या काळात द्राक्ष वेलींना सूर्यप्रकाशाची गरज असते. मुबलक सूर्यप्रकाश मिळाला तरच काडीत घडनिर्मिती होऊ शकते.

WhatsApp Group Join Now

10 मे पासून सतत पाऊस सुरू आहे. या काळात शेतकऱ्यांनी चुकीची औषधे वापरल्यास त्याचा गड निर्मितीवर पर्यायाने द्राक्षांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.

Draksh Bag Update 2025 कमी सूर्यप्रकाशात द्राक्ष बागांचे संगोपन, संरक्षण करण्याबाबत द्राक्ष उत्पादनकांमध्ये संभ्रम आहे. द्राक्ष वेलींच्या खरड छाटणीनंतर तीन टप्प्यात त्याची वाढ होते.

पहिल्या महिन्यात शाकीय वाढ, दुसऱ्या महिन्यात सूक्ष्म घडनिर्मिती, तिसऱ्या महिन्यात काडी परिपक्व होते. बहुतांश शेतकरी आणखी पहिल्या टप्प्यातच आहेत.

WhatsApp Group Join Now

बागेत पावसाचे पाणी साठल्याने आद्रता निर्माण झाली आहे. या काळात वेलींची वाढ होते, पानांची संख्या वाढते, पेऱ्यातील अंतर वाढते.

या गर्दीमुळे द्राक्ष घडांच्या डोळ्यांवर सूर्यप्रकाश मिळणार नाही. परिणामी, द्राक्ष घडांच्या निर्मितीवर आणि वाढीवर दुष्परिणाम होतो.

Draksh Bag Update 2025 पावसामुळे रोगप्रतिकारशक्तीमध्ये घट!!

Draksh Bag Update 2025 पावसामुळे रोगप्रतिकारक शक्तीमध्ये घट होते. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. दवण्या करपा रोगांची वाढ होऊ शकते. कोवळ्या फुटीवर दावणी रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो सततच्या पावसाने नवीन फुटीच्या शेंड्यांकडे करपा रोग येऊ शकतो. भुरी रोगाचा ही प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी जैविकावर भर द्यावा लागेल.

तज्ञाचा सल्ला

डॉ आर. जी. सोमकुंवर, द्राक्ष संशोधक

शेतकऱ्यांनी आवश्यकतेपेक्षा जास्त खतांचा, औषधांचा वापर करू नये. खतांचा संजीवकांचा तितकाच मात्राने/कमी मात्राने फवारणी घ्यावी.

बगल फुटी काढून टाकणे, शेंडा पिंचिंग करणे, शेंड्यांची वाढ नियंत्रणात ठेवणे नंतर पूर्णपणे बंद करून पोटॅश आणि स्फुरदचा वापर करणे इत्यादी उपाय करावे.

दिलीप माने द्राक्ष उत्पादक बागायतदार संघ, सोलापूर

उशिराने द्राक्ष पक्व झाले, त्यामुळे उशिराच मालाची तोडणी झाली. त्यानंतरच एप्रिल अखेर द्राक्ष वेण्यांची छाटणी करावी लागली छाटणीनंतर लगेचच पाऊस सुरू झाला. गरजे इतका सूर्यप्रकाश छाटणीनंतर नवीन घडनिर्मितीसाठी मिळत नाही. परिणामी दावणी रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment