उन्हाळी भुईमुगाची काढणी कधी आणि कशी कराल? जाणून घ्या सविस्तर; Bhuimung Kadhani 2025

Bhuimung Kadhani 2025 भुईमुगाच्या काढणीच्या वेळी जमिनीत थोडी ओल असल्यास काढण्याचे काम सोपे होते. शक्यतो काढणीच्या काळात ऊन भरपूर असल्यास काढण्याचे काम चांगले होते. पुढे चांगले ऊन मिळेल म्हणून काढणीस उशीर केला तर उपट्या जातीतील शेगांच्या जाण्यांना आतल्या आत मोड येऊ शकतात. पुढे अधिकच उशीर केला तर शेंगांना मोड फुटतात व मोठे नुकसान संभवते.

Bhuimung Kadhani 2025

WhatsApp Group Join Now

काढणी अगोदर शेंगा पक्व होऊन गेल्या असतील तर दाणे काळे पडतात व उत्पादनाची प्रत खालावून बाजारभाव कमी मिळतो. काढणी लवकर केल्यास शेंगांमध्ये अपक्व दाण्याचे प्रमाण जास्त राहते. त्यामुळे उत्पादन कमी येते, उत्पादनाची प्रत घटते, शेंगातील जाण्यात तेलाचे प्रमाण कमी राहते. खूपच उशिरा काढणी केल्यास जमीन टणक होऊन पुष्कळच्या शेंगा जमिनीतच राहतात. त्या खणून काढाव्या लागल्याने काढणीचा खर्च वाढतो.

लातूर, अकोला आणि अमरावती बाजारात तुरीला मिळाला उच्चांकी दर वाचा सविस्तर;

Bhuimung Kadhani 2025 त्याकरिता भुईमुगाची काढणी योग्य वेळीच करणे गरजेचे असते. भुईमुगाचे पीक काढण्यास तयार झाले किंवा नाही, हे पाहण्याकरिता शेतातील ठिकाणाची काही झाडे उपटून शेंगा पक्व झाल्या की नाही हे पाहावे.

जेव्हा ढाळ्यास पक्व शेंगांचे प्रमाण जास्त आहे असे दिसून येईल, ती वेळ काढणीस योग्य आहे, असे समजावे. यावेळी भुईमुगाची पाने पिवळी होऊन गळू लागतात.

WhatsApp Group Join Now

Bhuimung Kadhani 2025 उपट्या जातीचे वेल उभट वाढतात. त्यामुळे ते उपटून घेऊन हाताने शेंगा तोडून काढाव्यात. पसाऱ्या जातीचे वेल लहान कुळवावर उभे राहून फिरवून गोळा करावेत. नंतर जमिनीत असलेल्या शेंगा खोल कुळव चालवून किंवा खुरप्याने चाळण करून किंवा लाकडी नांगराच्या साह्याने नांगरून काढाव्यात. वेलाच्या शेंगा काढल्यावर त्या खळ्यावर 7 ते 8 दिवस चांगला वाळवाव्यात.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment