Banana Farming 2025 नांदेड जिल्ह्याच्या पार्टी (ता.अर्धापूर) परिसरात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी केळी काढण्यापूर्वी व्यापाऱ्यांना इसार पैसे घेऊन माल देण्याचा सौदा देखील केला होता.

आणि त्यांनी केळीच्या भरवशावर मुलाबाळांचे शिक्षण आणि विवाहाचे देखील नियोजन लावून ठेवले होते. मात्र, काढणीला आलेल्या पिकांचेच अतोनात नुकसान झाले त्यासोबतच बाजारातही कच्च्या केळीचे दर अचानक कोसळल्याने शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांचा बियाणे खरेदीला उस्फूर्त प्रतिसाद खत विक्री वेगात, वाचा सविस्तर!
Banana Farming 2025 अर्धापूर तालुक्यातील चविष्ट आणि टिकाऊ असल्याने प्रदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. यामुळे येथील केळीला चांगला दर असतो. मात्र, वादळी वाऱ्याचा फटका बसल्याने केळीच्या दरात हे कमालीची घट झाली आहे. चार दिवसांपूर्वी देशांतर्गत जाणाऱ्या केळीला 2200 ते 1900 रुपये प्रति क्विंटल दर होता. तर परदेशात निर्यात होणारा केळीला 2400 ते 2500 रुपये दर होता.

Banana Farming 2025 मात्र, एका दिवसात घरात मोठी घसरण झालेली दिसत आहे. देशांतर्गत निर्यात होणाऱ्या मालात 900 रुपयांनी तर परदेशात जाणाऱ्या केळीमध्ये 1100 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा फटका बसला आहे.
Banana Farming 2025 दाभड, मालेगाव व अर्धापूर तीन मंडळात हजारो हेक्टर वर केळीची लागवड झालेली आहे. काही भागातील केळीला वादळी वाऱ्याचा फटका बसलेला नसताना सुद्धा आता दरात घट झाल्याने आता त्यांना आर्थिक फटका बसला आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |