Avakali Pavus 2025 मराठवाड्यात मान्सून पूर्व पावसाने शेतीचे नुकसान केले. विभागात एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांची शेती उध्वस्त केली आहे.

शेतकरी अजूनही शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. खरिपाची तयारीला सुरुवात झाली असली, तरी भरपाई न मिळाल्याने आर्थिक संकट गडद झाले आहे.
पीएम किसानचा 20 वा हप्ता खात्यावर जमा होणार; यादीत तुमचे नाव कसे चेक कराल?
विभागात अवकाळी पावसामुळे तब्बल 17 हजार 644 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला. 27 हजार 103 शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

Avakali Pavus 2025 आठ जिल्ह्यातील 1 हजार 227 गावांमध्ये गावांमधील तब्बल 17 हजार 644 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये 10 हजार 227 हेक्टर मधील बागायती, 565 हेक्टर मधील क्षेत्रातील, तर 6 हजार 851 हेक्टर मधील फळ पिकांचे नुकसान झाले. खरीप हंगामातील पेरण्यांना सुरुवात झाली असून, शेतकरी मतीविना हाताशी झाला आहे.
एप्रिल व मे महिन्यात 1,047 गावातील एकूण 19,852 शेतकऱ्यांचे 12 हजार 712 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यापैकी हेक्टर फळ पिकांचे नुकसान झाले. 10 हजार 176 बागायती, जिरायत क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले.
Avakali Pavus 2025 जून महिन्यात 180 गावातील सात हजार 251 शेतकरी बाधित झाले. या शेतकऱ्यांच्या हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये 4875 हेक्टर फळ पिकांचे, 51 हेक्टर बागायती, तर 5.82 हेक्टर बाधित क्षेत्राचा समावेश आहे. विविध घटना आजवर 35 जणांचा मृत्यू झाला तर 51 जण जखमी झाले.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाला. जालना 7, परभणी, हिंगोली प्रत्येकी 2, बीड 5, लातूर 6, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यात दहा जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासकीय अहवालात म्हटले आहे.
Avakali Pavus 2025 राजधानी तहानलेली!
मराठवाड्याची राजधानी असलेले छत्रपती संभाजी नगर हा जिल्हा सर्वाधिक तहानलेला आहे. 175 गावे, 24 वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे.
जिल्हा | टँकरची संख्या | गावे | वाड्या |
छत्रपती संभाजी नगर | 245 | 165 | 24 |
जालना | 181 | 23 | 5 |
परभणी | 8 | 4 | — |
हिंगोली | 2 | 1 | 3 |
नांदेड | 32 | 9 | 43 |
बीड | 2 | 1 | 2 |
लातूर | 0 | 0 | 0 |
धाराशिव | 0 | — | — |
एकूण | 470 | 289 | 87 |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |