यंदा जून मध्येच ‘अलमट्टी’ 61 टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण Almatti Dam Water Storage 2025

Almatti Dam Water Storage 2025 अलमट्टी धरणामध्ये 123 टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता असून, धरणात सध्या 75.25 टीएमसी पाणीसाठा आहे. धरण 61 टक्क्यांपेक्षा अधिक भरल्यामुळे सांगली, कोल्हापूर, जिल्ह्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. केंद्रीय जल आयोगाच्या सूचनांकडेही अलमट्टी धरण व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले आहे.

Almatti Dam Water Storage 2025

सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील धरण क्षेत्रात सध्या संततधार पाऊस सुरू आहे. जुलै, ऑगस्ट मध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. असे असतानाही जून महिन्यातच अलमट्टी धरण 61 टक्के भरले आहे.

राज्यात मुसळधार पाऊस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला पावसाचा रेड सिग्नल वाचा सविस्तर;

धरणात जवळपास एक लाख क्युसेकने पाण्याची आवक सुरू असून, विसर्ग केवळ 70 हजार क्युसेकने चालू आहे. अलमट्टी धरणातील पाण्याची आवक लक्षात घेतल्यास चार दिवसात धरण 70 टक्क्यांपेक्षा अधिक भरणार आहे.

WhatsApp Group Join Now

जुलै, ऑगस्टमध्ये पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू झाल्यास अलमट्टी धरणाचे अधिकारी पाणी व्यवस्थापन कसे करणार आहेत, असा प्रश्न सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

पाणी आलमट्टी धरणाच्या पाण्याची फुग कृष्णा नदीच्या महापुराला जबाबदार राहणार आहे. म्हणूनच कृष्णा नदी काठच्या नागरिकांना अलमट्टी धरणातील सध्याच्या पाणी साठ्याची चिंता वाटू लागली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत आहे.

Almatti Dam Water Storage 2025 महाराष्ट्राच्या विनंतीलाही फटकारले….

महाराष्ट्र शासन आणि कृष्णा महापूर नियंत्रण समिती, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पेटकर आदींनी पत्राद्वारे अलमट्टी धरण 31 जुलै पर्यंत 50 टक्केच भरले पाहिजे.

WhatsApp Group Join Now

धरणात 50% पेक्षा जास्त पाणी साठा करू नये, अशा विनंतीची पत्रे कर्नाटक सरकारला पाठवली आहेत. पण कर्नाटक सरकारने धरणातील पाणीसाठा कमी करण्याऐवजी 61 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

Almatti Dam Water Storage 2025 केंद्रीय जल आयोगाकडूनही दखल नाही!

केंद्रीय जल आयोग याकडेही अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्याबाबत तक्रार केली आहे. पण केंद्रीय जल आयोगाने ही अलमट्टी धरण व्यवस्थापनाला पाणीसाठा आटोक्यात ठेवण्याबाबत काहीच सूचना दिली नाही. यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Almatti Dam Water Storage 2025 महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारवर दबाव टाकून पाणीसाठा कमी करण्याबाबत सूचना दिली नाही तर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले करणार आहेत, असा इशारा कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी दिला आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment