AI in Sugarcane 2025 पुणे: ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी राज्यातील एक लाख शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग करण्यात येणार आहे

यातील 10 हजार शेतकऱ्यांना व्हीएसआय व राज्य सरकार 90 हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी प्रति हेक्टरी 9 हजार 250 रुपये अनुदान देणार आहे.
विदर्भात उकडाची लाट ‘या’ तारखे नंतरच पावसाची शक्यता वाचा सविस्तर;
AI in Sugarcane 2025 कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरण्यासाठी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या दोन वर्षांसाठीचा 500 कोटी रुपयांचा निधी एकाच वर्षात वापरू, त्यासाठी राज्य महामंडळाची मान्यता घेऊ, असेही ते म्हणाले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ यावर झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते.

AI in Sugarcane 2025 या व्यतिरिक्त जे शेतकरी यंत्रणा लावू इच्छित असतील त्यांनाही मदत करण्यात येईल. त्यासाठी राज्य सरकारी बँक साखर कारखान्यांना 6 टक्के दराने कर्जपुरवठा देण्यात येईल.
मात्र, दिलेल्या अनुदान कारखान्यांनी त्याच कारणासाठी वापरावेत. यंदाचा साखर हंगाम कारखान्यांसाठी परीक्षा पाहणारा ठरला आहे. ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरण्यासाठी आता राज्य सरकारी बँकेने पुढाकार घेतला आहे.
राज्यात प्रायोगिक तत्त्वावर 1 लाख क्षेत्रात शेतकऱ्यांच्या शेतावर लावण्यात येणाऱ्या या तंत्रज्ञानासाठी साखर कारखाने आर्थिक मदत करणार आहेत. कारखान्यांना ही मदत देण्यासाठी राज्य सरकारी बँक 6 टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करणार आहे.
AI in Sugarcane 2025 प्रती हेक्टरी उत्पादन वाढले पाहिजे
शरद पवार यांनी कारखान्यांना आता अस्तित्वात असलेले यंत्राचा वापर करण्यासाठी प्रति हेक्टरी उत्पादन वाढले पाहिजे असे नियोजन करावे असा सल्ला दिला. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राची भूमिका महत्त्वाची आहे.
मात्र, अपवाद वगळता अन्य केंद्र काम करत नसल्याचे चित्र आहे. हे चांगले नसून, या सर्व केंद्रांना कामाला लावा अशी सूचना त्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली.
तसेच कारखान्याचा कृषी विभागानेही यापुढे ऊस उत्पादनात दर्जेदार वाढ, साखर उतारा आणि लागवड वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचनाही केली.
कोकाटे यांनी हे तंत्रज्ञान पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रातही लावले जाईल. शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत भांडवली गुंतवणूक वाढवणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले, तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी यंदाच्या हंगामाची स्थिती बघताना नाबार्डने कारखान्यांना कर्जाचे पुनर्गठण करण्याबाबत मान्यता दिली आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |