गतवर्षाच्या तुलनेने पेरणी 11 टक्के जास्त; नाशिक जिल्ह्यात किती झाली पेरणी? Agriculture News 2025

Agriculture News 2025 नाशिक: यंदाच्या खरीप हंगामात 15 जून अखेर केवळ 15 टक्के पेरणी झाली होती. मात्र, अठराभरापासून पावसाने जोर पकडल्यानंतर काही भागात पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे पेरणीसाठी पोषक वातावरण झाले.

Agriculture News 2025

वापसा मिळाल्याने 22 जून अखेर पेरणी क्षेत्र 31 टक्क्यांवर आले. मागील वर्षाच्या तुलनेने पेरणी 22 जून अखेर ११ टक्क्यांनी जास्त झाल्याने दिलासा मिळाला.

या दोन मार्केटमध्ये तुरीला 7 हजार रुपयांचा दर, वाचा सविस्तर बाजारभाव;

Agriculture News 2025 मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतात पाणी साचले होते. त्यामुळे यंदा मशागत लांबली. परिणामी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरणीने जोर पकडला नव्हता. भाताची पेरणी मात्र रखडली असून 93,467 हेक्टर पैकी केवळ १५६ हेक्टर म्हणजे 0.17% पेरणी 20 जून अखेर झाले आहे.

WhatsApp Group Join Now

Agriculture News 2025 जिल्ह्यात यंदा देखील मका व सोयाबीन पिकांचे क्षेत्र सर्वाधिक राहणार असून रब्बी हंगामाप्रमाणे मात्र ज्वारीची कोठारे भरणार नाही. कारण ज्वारीची फक्त 5 टक्केच पेरणी होईल. भुईमूग क्षेत्रातही यंदा वाढ झाली आहे. काही तालुक्यांमध्ये पेरणी अजूनही रखडले असल्याचे आकडेवारीवरून दिसते.

बाजरी पीक 18% , मका 48%, ज्वारी 4.82%, सोयाबीन २२.५%, भात 0.17 %, तर कापूस 30.20% अशी अद्याप पर्यंत पेरणी झाली आहे. चांदवड, येवला, नांदगाव, देवळा, मालेगाव या तालुक्यात पेरण्यांची टक्केवारी अधिक आहे.

Agriculture News 2025 गतवर्षापेक्षा यंदा 17 हजार हेक्टरने पेरणी क्षेत्र कमी..

2024 च्या खरीप हंगामात सरासरी पेरणी क्षेत्र 6 लाख 58 हजार इतके होते. तर यांना 6 लाख 40 हजार 551 इतके असेल. मागील वर्षाच्या तुलनेने यंदाचे पेरणी क्षेत्र 17 हजार हेक्टरने कमी असेल. मे महिन्यातील अवकाळी पावसानंतर पेरणी क्षेत्रात बदल केला.

WhatsApp Group Join Now

बागलाण, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, इगतपुरी या तालुक्यांमध्ये पेरण्या आटोप्याचे प्रमाणे इतर तालुकांच्या तुरनेने कमी आहे. कारण या तालुक्यांमध्ये वापसा मिळण्यास उशीर होत आहे.

Agriculture News 2025 भाताच्या शेतात नर्सरी बनवण्याचे काम यंदा मे महिन्यातील अवकाळी पावसाने लांबले. त्यामुळे भाताची पेरणी संथगतीने झाली.

मात्र, पुढील आठवड्यात भाताचे पेरणी क्षेत्र वाढेल, पावसाचे प्रमाण असेच राहिले तर सरासरी क्षेत्र यंदा पूर्ण होईल. केवळ अतिवृष्टी नको मात्र, शेतीसाठी सध्या तरी अनुकूल वातावरण असून योग्य ती काळजी घेऊन पेरणी करावी. –अभिमन्यू काशीद, जिल्हा कृषी अधीक्षक.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment