Zero Tillage Technology 2025 शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजे जमिनीची फारशी मशागत न करता पिके किंवा कुरण वाढविण्याचे तयार करण्यात आलेले एक कृषी तंत्र आहे. या तंत्रातून जमिनीची धूप रोखण्यास मदत होते. आज आपण यात तंत्रज्ञानाचा वापर करणे का आवश्यक आहे. याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत…

शून्य मशागत तंत्रज्ञानातून शेती केल्यास जमिनीत, विशेषतः उतार असलेल्या भूभागावरील वालुकामय आणि कोरड्या जमिनीत होणारे जमिनीची धूप रोखण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.
सिल्क समग्र-2 योजनेचे अनुदान वितरित करण्यासाठी शासनाची मंजुरी वाचा सविस्तर;
Zero Tillage Technology 2025 शून्य मशागतीचा उपयोग
- जमिनीत शिरणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढवते, सेंद्रिय पदार्थ मातीत टिकून राहण्यास मदत करते पोषक घटक जमिनीस देणे याचा समावेश या तंत्रात होतो.

- या पद्धतीमुळे जमिनीखाली आणि पृष्ठभागावरील नैसर्गिक जीव जंतूच्या प्रमाणात आणि विविधतेत वाढ दिसून येते.
- रासायनिक पद्धती तणांच्या नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर केला जातो, तर सेंद्रिय पद्धतीत तण दाबण्यासाठी आच्छादन पिके लावून त्याचे अवशेष आच्छादन म्हणून शेतात काम करतात.
- आज शेतीमध्ये मशागतीचे फार महत्त्व आहे. परंतु नो-टील पद्धतीने शेती केल्यास यशस्वी होऊ शकते. किमान मशागत किंवा लो-टील पद्धती आणि नो-टील पद्धती एकत्र करतात. त्यामुळे उथळ मशागत वापरली जाऊ शकते. परंतु नांगरणी केली जात नाही किंवा पट्टी मशागतीचा वापर केला जात नाही. तसेच यंत्राने केली जाणारी मशागत पूर्ण बंद होणे गरजेचे आहे.
रासायनिक खतांचा दुष्परिणाम
रासायनिक खतांचा भरमसाठ वापर वाढल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी आहे. खतांच्या अतिवापर आणि चुकीच्या वापरामुळे मातीची सुपीकता घटते आहे. पर्यावरणाची हानी होताना दिसत आहे. त्याचबरोबर मानवाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम हळूहळू होत आहे.
Zero Tillage Technology 2025 ही आहेत कारणे!
मातीची सुपीकता घटणे | रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीतील सेंद्रिय घटक कमी होतात, ज्यामुळे मातीची सुपीकता कमी होते. |
जमिनीचे आम्लीकरण | रासायनिक खतांमध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असल्याने, ते जमिनीला आम्लीय बनवतात, ज्यामुळे पिकांची वाढ खुंटते. |
पाणी प्रदूषण | रासायनिक खतांचे घटक पाण्याचे प्रदूषण करतात, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा दूषित होतो. |
हवामान बदल | रासायनिक खतांच्या उत्पादनामुळे आणि वापरामुळे ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन वाढते, ज्यामुळे हवामान बदलाची समस्या वाढते. |
जैवविविधता कमी होणे | रासायनिक खतांच्या अतिवापर आणि चुकीच्या वापरामुळे मातीतील सूक्ष्मजीवांसाठी योग्य वातावरण राहत नाही, ज्यामुळे जैवविविधता कमी होते. |
मानवी आरोग्य धोक्यात | रासायनिक खतांच्या अतिवापर व चुकीच्या वापरामुळे पिकांमध्ये विषारी घटक वाढतात, ज्यामुळे मानवाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ लागला आहे. |
कीटकांची संख्या वाढणे | रासायनिक खतांच्या चुकीच्या वापरामुळे मातीतील नैसर्गिक कीटकनाशक घटकांची संख्या कमी होते, ज्यामुळे कीटकांची संख्या वाढते. |
या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी शून्य मशागत तंत्रज्ञान अधिक फायदेशीर ठरू शकते. जमिनीत सेंद्रिय पदार्थ कुजण्याची प्रक्रिया कायम सुरू ठेवणे आहे आवश्यक आहे.
यामुळे परिश्रम, इंधन, पाणी तसेच यंत्रसामग्रीवर होणारा खर्च टाळता येऊ शकतो. त्याचबरोबर या तंत्रज्ञानातून आपण जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरण्यास तसेच पाणी धारण क्षमता वाढण्यास उपयोगी ठरते.
बदलत्या हवामानाचा पर्जन्यमान वितरणावर परिणाम झाला आहे. कुठे अति पाऊस पडतो तर कुठे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा थेट परिणाम शेतीवर होताना दिसतो. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक शेतीकडे वळणे आवश्यक आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |