Tembhu Mhaisal Yojana 2025 सांगोला : सांगोला तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी तसेच पाणीटंचाई दूर करण्यासाठी येत्या 10 एप्रिल पासून टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू होणार आहे.

यातून माण व कोरडा नदीवरील बंधारे भरून देण्यात येणार आहेत तशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांनी सांगितले.
शेततळ्यात प्लास्टिक अस्तरीकरण करण्यास मिळतंय 1 लाखाचे अनुदान, वाचा सविस्तर;
Tembhu Mhaisal Yojana 2025 मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात जलसंपदा विभाग अधिकारी यांच्या समवेत पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर, चेतनसिंह केदार सावंत यांच्यासह आमदार उपस्थित होते.
Tembhu Mhaisal Yojana 2025 ‘वीस’ गावांच्या पाणी प्रश्न सुटणार…
Tembhu Mhaisal Yojana 2025 टेंभूचे पाणी माण नदीत सोडल्यानंतर बलवडी, वझरे, नाझरे, चिणके, अनकढाळ, वाटंबरे, कमलापूर, वासुद, अकोला, कडलास, वाडेगाव, बामणी, सावे, मांजरी, देवळे, मेथवडे या गावं सह अन्य 15 ते 20 गावांचा प्रश्न सुटणार असल्याचे चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |