जलसाठ्यात झपाट्याने घट काय आहे, कारण जाणून घ्या; Dam Water Storage 2025

Dam Water Storage 2025 राज्यात तापमानाचा पारा सतत वाढत असताना राज्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये 52.5 टक्के जलसाठा शिल्लक आहे. सध्या धरणामध्ये असलेला पाणीसाठा किमान जुलैपर्यंत पुरवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

Dam Water Storage 2025

यंदापासून बाष्पीभवन वाढल्याने जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी यावेळी धरणामध्ये 42.94 टक्के जलसाठा शिल्लक होता. राज्यात अनेक ठिकाणी पारा 40 अंश सेल्सिअस वर गेला आहे.

उन्हाळी पिके आणि फळ पिकांसाठी काय आहे; कृषी सल्ला ? 

हवामान बदलामुळे सरासरी तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी तापमानाचे नवे उच्चांक गाठत आहे. विदर्भात काही ठिकाणी पारा 47 अंश सेल्सिअस पर्यंत जातो. कडक उन्हामुळे धरणामधील पाण्याची बाष्पीभवन देखील वेगाने होत आहे. त्यामुळे सध्या असलेला पाणीसाठा मे महिन्यात झपाट्याने कमी होताना दिसेल.

WhatsApp Group Join Now

Dam Water Storage 2025 तर टँकरचा आधार

ज्या गावांमध्ये विहिरी, कूपनलिकेने नागरिकांना पाणी पुरवठा होत आहे. त्या गावातील विहिरी, कूपनलिका आटल्या आहेत. त्यामुळे राज्यातील 10 गावे व 25 वाड्यांमध्ये 19 टँकरने सुरू असल्याचे 3 मार्चच्या अहवालात सांगण्यात आले. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत खूप कमी आहे. येत्या तीन महिन्यात पाणीटंचाईची झळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

तो पर्यंत पाणी जपूनच वापरावे लागेल

राज्यात कोकणात साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. संपूर्ण राज्य व्यापण्यासाठी मान्सूनला जुना अखेर पर्यंतचा कालावधी लागतो. धरणामधील पाणीसाठा वाढण्यास जुलैमध्ये सुरुवात होते. तोपर्यंत पाणी जपूनच वापरावे लागते.

Dam Water Storage 2025 शिल्लक पाणीसाठा

मध्यम प्रकल्प53.42 टक्के
मोठे प्रकल्प42.06 टक्के
लघु प्रकल्प9.99 टक्के

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now

Leave a Comment