हरभरा लागवड तंत्रज्ञान व सुधारित वाणांची ओळख!! Gram cultivation 2025

Gram cultivation 2025 हरभरा हे रब्बी हंगामात पिकणारे एक प्रमुख कडधान्य पीक आहे. हि वनस्पती सुमारे 24 इंच उंच वाढते हरभरे दाणा स्वरूपात असताना एका वेष्टणांत असतो त्याला घांटा असे म्हणतात.

Gram cultivation 2025

Gram cultivation 2025 याचे मुळस्थान तुर्कस्तान आहे असे मानतात भारत पाकिस्तान आणि तुर्कस्तान मध्ये सर्वात जास्त प्रमाणात लागवड केली जाते. हरभरा एक महत्वाचे कडधान्य असून रोजच्या आहारात प्रथिनांचा पुरवठा करते.

लसुण लागवड तंत्रज्ञान!!

हरभरा जमिनीला वातावरणातील 30 किलो प्रति हेक्टरी नत्र उपलब्ध करून देतो.हरभरा पासून डाळ बेसन किंवा भाजी हि तयार करतात. हरभरा पाण्यात उकळवून भाजून खाता येतो. पानांची भाजी पण तयार करतात, अंकुर आलेले बियाणे रक्त दोषाच्या रोगावर औषध म्हणून उपयोग आहे. हिरव्या पानातून मिळणारे मॉलीक आणि ऑक्झालिक ऍसिड पोटांच्या आजारासाठी उपाय म्हणून वापरता येते हरभऱ्यापासून अनेक खाद्यपदार्थ बनवता येतात.

WhatsApp Group Join Now

जमीन: Gram cultivation 2025

हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी काळी कसदार व चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. हलकी अथवा भरड, पाणथळ, चोपण किया क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी निवडू नये तसेच, जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 या दरम्यान असावा.

पूर्वमशागत: Gram cultivation 2025

खरिपाचे पीक निघाल्यानंतर खोल नांगरट करावी. कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. काडीकचरा वेचून जमिन स्वच्छ करावी. खरिपामध्ये शेणखत दिले नसल्यास हेक्टरी 5 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळावे. याप्रमाणे सप्टेंबरच्या अखेरीस पेरणीसाठी शेत तयार ठेवावे.

पेरणीची वेळ: Gram cultivation 2025

हरभरा हे रब्बी हंगामाचे पीक असल्याने कोरडी व थंड हवा त्याला चांगली मानवते. कोरडवाहू क्षेत्रामध्ये जेथे सिंचनाची सोय अजिबात नसेल तेथे हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणानंतर म्हणजे 25 सप्टेंबर नंतर जमिनीतील ओल कमी होण्यापूर्वी पेरणी करावे यासाठी प्रामुख्याने विजय, दिग्विजय आणि फुले विक्रम हे वाण वापरावेत. बागायती हरभरा 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान पेरल्यास चांगले उत्पादन येते. पेरणीची वेळ लांबल्यास किंवा डिसेंबर नंतर पेरणी केल्यास उत्पन्न कमी मिळते. काबुली हरभऱ्याची पेरणी सिंचनाची सोय असेल तरच करावी.

WhatsApp Group Join Now

बीजप्रक्रिया आणि जिवाणू संवर्धन:

बियाणाची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोप अवस्थेत बुरशीजन्य रोपांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणास 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा अथवा 2 ग्रॅम थायरम + 2 ग्रॅम कार्बेन्डाझिम एकत्र करून चोळावे. प्रति किलो बियाण्यास यानंतर 20 किलो बियाण्यास रायझोबियम जिवाणू संवर्धनाचे 250 ग्रॅम वजनाचे एका पाकिटातील संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात 125 ग्रॅम गूळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे. यामुळे ग्रंथींचे प्रमाण वाढवून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो. आणि पिकाचे 3 ते 5 टक्के उत्पादन वाढते.

बियाणे प्रमाण:

हरभऱ्याच्या विविध दाण्यांच्या आकारमानानुसार बियांचे प्रमाण वापरावे लागते. म्हणजे हेक्टरी रोपांची संख्या अपेक्षित मिळते. विजय या मध्यम दाण्यांच्या वाणाकरिता 65 ते 70 किलो तर विशाल दिग्विजय आणि विराट या टपोऱ्या दाण्यांच्या वाणाकरिता 100 किलो प्रति या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे.

तसे कृपा आणि पिके व्ही. 4. या जास्त टपोऱ्या काबुली वाणांकरिता 125-130 किलो प्रति हेक्टर बियाणे वापरावे. हरभरा सरी वरंब्यावरही चांगला येतो. 90 सेमी रुंदीच्या सऱ्या सोडाव्यात आणि वरंबाच्या दोन्ही बाजूला 10 सेमी अंतरावर बियाणे टोकन करावे. काबुली वाणासाठी जमीन ओली करून वाफश्यावर पेरणी केली असता रुजवा चांगला होतो.

खते: Gram cultivation 2025

सुधारित हरभऱ्याचे नवे वाण खत आणि पाणी यात चांगला प्रतिसाद देतात, त्यासाठी खताची मात्रा योग्य प्रमाणात देणे गरजेचे आहे. प्रति हेक्‍टरी चांगले कुजलेले 5 टन शेणखत किंवा कंपोस्ट शेवटच्या कुळवीच्या वेळी शेतात पसरावे. पिकांची पेरणी करताना 25 किलो नत्र, 50 मिली स्फुरद आणि 30 किलो पालाश प्रती हेक्टर म्हणजेच 125 किलो डायआमोनियम फॉस्फेट अधिक 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश अथवा 50 किलो युरिया आणि 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रती हेक्टरला द्यावे. संतुलित खतांच्या वापरामुळे उत्पादनात 18 ते 55 टक्के वाढ होते. पिक फुलोऱ्यात असताना 2 टक्के युरियाची पहिली फवारणी आणि त्यानंतर 10 ते 15 दिवसांनी परत युरियाची दुसरी फवारणी करावी. यामुळे पीक उत्पादनात वाढ होते.

अंतरमशागत:

पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत स्रुवतीपासूनच सुरुवातीपासूनच तनविरहित ठेवावे. पीक 20 दिवसांचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी. आणि पीक एक महिन्याचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी शक्यतो वाफश्यावर करावी. कोळपणीमुळे जमिनीत हवा चांगली खेळती राहते. आणि पिकांची वाढ चांगली होते.

कोळपणी नंतर एक खुरपणी करावी. कोरडवाहू क्षेत्रामध्ये कोळपणीमुळे जमिनीत पडत असलेल्या भेगा बुजून जातात आणि ओल टिकून राहते. तण नियंत्रणासाठी तणनाशक वापरावयाचे असल्यास पेरणी करताना वाफश्यावर स्टॉप हे तणनाशक 2.5 लिटर प्रति हेक्टर प्रमाणे 500 लिटर पाण्यातून फवारावे. फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे.

पाणी व्यवस्थापन:

जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागतच पाणी द्यावे. बागायत हरभरा शेताची रानबांधणी करताना 2 सऱ्यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबी सुद्धा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते.

मध्यम जमिनीत 20 ते 25 दिवसांनी पहिले, 45 ते 50 दिवसांनी दुसरे, आणि 65 ते 70 दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीस पाण्याच्या दोनच पाळ्या पुरेशा होतात. त्यासाठी पहिले पाणी 30 ते 35 दिवसांनी व दुसरे पाणी 65 ते 70 दिवसांनी द्यावे. हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे 25 सेमी पाणी लागते. प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर महत्त्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पीक उभळण्याचा धोका असतो.

स्थानिक परिस्थितीनुसार जमिनीच्या खोलीनुसार पाहण्याच्या 2 पाळ्यामध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडण्याच्या आतच पिकास पाणी द्यावे. पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा मूळकूजव्या रोगाने पिकाचे नुकसान होते.

तुषार सिंचन हरभरा पिकास वरदान:

हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वाहनांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. यासाठी या पिकास तुषार सिंचन अतिशय उत्कृष्ट पद्धत आहे. सारा, पाट-वरंबा यासारख्या पद्धतीने पाणी दिल्यास जमीन दाबून बसते, व जमिनीचा भुसभुशीतपणा कमी होतो. व त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. परंतु तुषार सिंचनाने जमीन नेहमी भुसभुशीत राहते कोणतीही मशागत अतिशय सुलभ करता येते. अगोदर तुषार सिंचनाने जमीन ओलावून मशागत केली आणि तिफण किंवा पाभरीच्या साह्याने काकऱ्या पाडून हरभरा बियाणे टोकन केले तर पिकाची उगवण अतिशय चांगली होते.

तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास शेतामध्ये सारा, पाटा वरंबा पडण्याची गरज नसते. पर्यायाने यावरील खर्चात बचत होते. पिकात तणांचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा तुषार सिंचन पद्धतीत कमी होतो आणि असलेले तण काढणे अतिशय सुलभ जाते. नेहमीच्या पद्धतीत पिकास अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे मूळकूज सारख्या रोग पिकावर येतात. आणि पीक उत्पादनात घट येते. परंतु पाणी अतिशय कमी प्रमाणात देता येत असल्याने मूळकूज रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते.

नेहमीच्या पाणी देण्याच्या पद्धतीत जास्त पाण्यामुळे पिकास दिलेली खते, द्रव्ये वाहून किंवा खोलवर जाण्याची शक्यता असते, शिवाय वाफसा लवकर येत नसल्याने अन्नद्रव्य पिकास उपलब्ध होतीलच याची खात्री नसते, मात्र तुषार सिंचन पद्धतीमध्ये जमिनीत नेहमीच वाफसा स्थिती राहत असल्यामुळे पिकास दिलेली सर्व खते पूर्णपणे उपलब्ध होतात आणि वाफसा स्थितीमुळे पिकाची अन्नद्रव्य शोषणाची क्षमता वाढते. अशा रीतीने तुषार सिंचन पद्धतीने हरभरा पिकास पाणी दिल्यास हरभरा उत्पादनात अशादायक आणि भरीव वाढ होते.

पीक संरक्षण: Gram cultivation 2025

हरभरा पिकाचे घाटे अळीमुळे 30 ते 40 टक्के नुकसान होते. पीक 3 आठवड्यांचे झाले असता त्यावर बारीक अळ्या दिसू लागतात. पानांवरती पांढरे डाग दिसतात आणि शेंडे खाल्लेले दिसतात. याकरिता पिकास फुलकळी लावण्याच्या वेळेस पहिली फवारणी करावी. यासाठी 25 किलो निंबोळी पावडर रात्रभर 50 लिटर पाण्यात भिजत ठेवावी.

सकाळी कापडाच्या सहाय्याने अर्क काढून त्यामध्ये 450 लिटर पाणी टाकावे. हे द्रावण एक हेक्टर क्षेत्रावर फवारावे पुढे 10 ते 15 दिवसांनी हेलिओकील 500 मिली 500 लिटर पाण्यातून प्रती हेक्टर या विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावी. आवश्यकता असेल तर तिसरी फवारणी 18.5% एस सी क्लोरअन्ट्रीनिलीप्रोल 100 मिलि हेक्टरला 500 लिटर पाण्यातून फवारावे.

या किडीचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने चांगले होते. त्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्‍टरी 200 ग्रॅम ज्वारी, शेतामध्ये पेरावी. या पिकाचा किडींच्या आकर्षणासाठी उपयोग होतो. त्यामुळे घाटेअळीचे नियंत्रण होते. पक्षांना बसायला जागोजागी तूर काटक्याची मचाणी लावावी त्यावर कोळसा, चिमण्या, साळुंखे, असे पक्षी येतात आणि अळी वेचतात. तसेच हेक्टरी 5 कामगंध सापळे लावावे त्यामुळे किडींचे नेमके प्रमाण कळते आणि फवारण्या देणे योग्य ठरते.

काढणी: Gram cultivation 2025

हरभरा पिक 110 ते 120 दिवसांमध्ये तयार होते पीक ओलसर असताना काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतर मगच हरभऱ्याचे काढणी करून मळणी करावी. यानंतर 6 ते 7 दिवस कडक होऊ द्यावे. हरभरा कोठी मध्ये साठवून ठेवावा त्यामध्ये कडुलिंबाचा पाला 5 टक्के घालावा त्यामुळे साठवणीतील कीड लागत नाही.

उत्पादन: अशा प्रकारे सुधारित वाणांची आणि तंत्रज्ञानाचा वापर करून हरभऱ्याची लागवड केल्यास सरासरी 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment