जमिनीची मशागत /नांगरटीचे महत्त्व!! Importance of Soil Cultivation /Ploughing 2025

Importance of Soil Cultivation /Ploughing 2025 शेती मग ती बागायती असो कोरडवाहू चीरसाही शेती उत्पादन मिळवण्यासाठी संपूर्ण शेती शाश्वत कशी करता येईल, हे पाहिले पाहिजे. नैसर्गिक साधनसामग्री मध्ये जमीन व पाणी हवामान हे महत्त्वाचे घटक येतात. या तीनही घटकांमध्ये जमिनीला अनन्य साधारण महत्त्व आहे. शेतीमध्ये जमिनीची उत्पादकता टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी या नैसर्गिक साधनसामग्रीचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यकता आहे.

Importance of Soil Cultivation /Ploughing 2025

जमिनीमध्ये चांगले पीक येण्याकरिता त्या जमिनीचे भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी जमिनीच्या मशागतीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिकाची पेरणी होण्यापूर्वी जमिनीची जी मशागत केली जाते त्यास पार्श्व पूर्व मशागत असे म्हणतात. यापूर्वी मशागतीस पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. जमिनीची मशागत म्हणजे पिकाच्या वाढीसाठी जमिनीचा कठीण व घट्ट पृष्ठभाग विशिष्ट खोलीपर्यंत फोडून जमिनीला चांगल्या स्थितीत आणणे.

बीज प्रक्रिया: रोग नियंत्रणासाठी सोपा मार्ग; 

Importance of Soil Cultivation /Ploughing 2025 शेतकरी जमिनीची मशागत अनेक कारणांसाठी करत असतो बियांचे अंकुरण आणि मुळांची वाढ होण्याकरिता जमीन मोकळी व भुसभुशीत करणे गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तळांचा नायनाट करणे पूर्व मशागतीमध्ये नांगरट कुळवणी, ढेकळे फोडणे किंवा वखरणे सपाटीकरण, खत मिसळणे, जमीन घट्ट करणे, सरी काढणे इत्यादी कामांचा मशागतीत समावेश होतो.

WhatsApp Group Join Now

Importance of Soil Cultivation /Ploughing 2025 प्रत्येक जमिनीची दरवर्षी नांगरट करावीच असे नाही आपल्या जमिनीच्या आणि आपण घेणाऱ्या पिकाच्या गरजेनुसार ही मशागत करण्याची गरज आहे. त्याकरिता जमिनीवरील मागील पीक, पुढे घ्यावयाचे पीक, जमिनीचा प्रकार आणि हवामान इत्यादींवर अवलंबून असते.

Importance of Soil Cultivation /Ploughing 2025 नांगरट कशी करावी?

नांगरटीचे उद्देश साध्य होण्यासाठी पूर्वीचे पीक काढल्याबरोबर लगेच नांगरट करणे फायद्याचे ठरते. कारण यावेळी जमिनीत ओलावा असल्याने नांगरटीचे काम हलके होते, ढेकळे निघत नाहीत, नांगरट खोलवर होते, पूर्वीच्या पिकाचा पालापाचोळा, काडीकचरा जमिनीत गाडला जातो, व जमिनीस सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा होतो.

रब्बी उन्हाळी हंगामातील पिके काढल्यानंतर म्हणजेच सर्वसाधारणपणे मार्च एप्रिलमध्ये त्वरित नांगरण्या कराव्यात. हलक्या जमिनी पीक काढण्याच्या वेळी घट्ट होतात. म्हणून एप्रिल किंवा मे महिन्यात वाळवाचा पाऊस पडल्यानंतर किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला पहिला पाऊस पडल्यानंतरच नांगराव्यात.

WhatsApp Group Join Now

Importance of Soil Cultivation /Ploughing 2025 नांगरट किती खोल करावी?

हंगामात घ्यावयाच्या पिकानुसार नांगरटीची खोली ठरवावी सर्वसाधारणपणे ऊस, बटाटा, आले, भाजीपाला इत्यादी बागायती पिकांसाठी जमिनीची 15 ते 20 सेंटीमीटर खोल नांगरट करणे आवश्यक आहे. ज्वारी, बाजरी, गहू, भुईमूग या पिकांसाठी जमीन 10 ते 15 सेंटीमीटर खोल नांगरावी.

Importance of Soil Cultivation /Ploughing 2025 ढेकळे फोडणे

जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास किंवा पीक काढल्यानंतर जमीन नांगरण्यास वेळ गेल्यास मध्यम भारी जमिनीत ढेकळे निघतात.. अशा जमिनीत खरीपाची पिके घ्यावयाची असल्यास पहिला पाऊस पडेपर्यंत ढेकळे तशीच राहू द्यावीत पावसामुळे व उन्हामुळे ढेकळे नरम होऊन फुटण्याचे काम आपोआप होते.

दोन्ही हंगामात पिके घ्यावयाचे असल्यास बैल अवजारांच्या साह्याने किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने ढेकळे फोडावीत. पाणी उपलब्ध असल्यास पाणी दिल्याने ढेकळे नरम पडतात, व नंतर मैद फिरवल्याने ढेकळे फुटतात. जमीन सपाटीकरण होते व उगवून आलेले तनही मरून जाते.

ढेकळे फोडण्याचे फायदे

ढेकळे फोडण्याने जमीन सपाट करण्यास सुलभ होते. जमिनीस गुळव्याच्या पाळ्या देता येतात. जमिनीत शेणखत कंपोस्ट खत चांगले पसरवता येते सरी सरळ रेषेत येते. गादीवाफे सहजरित्या तयार करता येतात ढेकळे फोडल्याने पूर्वीच्या पिकांची धसकटे काडीकचरा वेचता येतो.

Importance of Soil Cultivation /Ploughing 2025 कुळवणी किंवा वखरणी

कुळवणीमुळे जमीन भुसभुशीत होते. जमिनीत हवा खेळती राहते पिकांची मुळे योग्य खोलीपर्यंत वाढतात. तणांचा नाश होण्यास मदत होते. शेवटच्या वखरणीपूर्वी शेतात शेणखत टाकल्यास ते जमिनीत चांगले मिसळते जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाणूंची वाढ होण्यास मदत होते.

Importance of Soil Cultivation /Ploughing 2025 जमीन सपाट करणे

पावसाचे पाणी किंवा पाटाचे पाणी एकाच दिशेने जमिनीतून वाहून न जाता किंवा कुठेतरी साचून न राहता ते सर्व ठिकाणी सारखे बसण्यासाठी जमीन सपाट करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे पिकाची एकसारखी वाढ होण्यास मदत होते. हे पूर्व मशागतीचे काम प्रत्येक जमिनीत व दरवर्षी करण्याची आवश्यकता नसते.

शेणखताचा /कंपोस्ट खताचा वापर

जमिनीचा भुसभुशीतपणा टिकून राहण्यासाठी तिच्या कणांची रचना सुधारली पाहिजे. यासाठी सेंद्रिय खते म्हणजे शेणखत अथवा कंपोस्ट खताचा वापर करणे महत्त्वाचे आहे. शेणखताच्या वापरणे जलधारण शक्ती वाढते, म्हणून पूर्व मशागतीच्या कामात शेणखत घालण्याच्या कामाचा अंतर्भाव करावा. अशा रीतीने शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची पूर्व मशागत करावी.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment