Soil Fertility 2025 शेती ही निसर्गाशी जुळवून घेतलेली कला आहे. शेतकरी आपल्या संपूर्ण जीवन शेतीवर अवलंबून ठेवतात, पण जर त्या शेतीतून सातत्याने यश हवे असेल, तर जुन्या पद्धतीत थोडा बदल करावा लागतो.

आजही महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांकडून वर्षानुवर्ष पिकाची एकाच पिकाची लागवड केली जाते. याचा परिणाम शेतीच्या उत्पादनावर, जमिनीच्या पोषण तत्त्वावर आणि रोग कीड नियंत्रणांवर होतो. हे चित्र बदलण्यासाठी ‘पीक फेरपालट’ हे अत्यंत प्रभावी तंत्र आहे.
नाशिक, मुंबई, पुणे बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय? वाचा सविस्तर;
पीक फेरपालट म्हणजे एका शेतात दरवर्षी किंवा हंगामागणिक वेगवेगळ्या प्रकारची पिके घेणे. उदा. एक हंगाम कापूस घेतल्यानंतर पुढील हंगामात कडधान्य किंवा धान्य घेणे.

यामध्ये मूळ कल्पना अशी की, प्रत्येक पीक जमिनीतील विशिष्ट अन्नद्रव्य वापरते आणि काही अन्नद्रव्य परतही देते. त्यामुळे विविध पिकांची लागवड केल्यास जमिनीतील अन्नद्रव्यांचे संतुलन राखले जाते.
दरवर्षी एकच पीक घेत राहाल तर नापिकी!
Soil Fertility 2025 सतत एकाच प्रकारचे पीक घेतल्याने जमिनीतील विशिष्ट अन्नद्रव्यांची कमतरता वाढते परिणामी पीक वाढत नाही झाडे चुकतात आणि उत्पादनात सातत्याने घट होते ही स्थिती नापी नापिकेच्या दिशेने नेणारी असते
कापसावर कापूस मक्यावर सतत कापूस किंवा मका घेणे टाळा
सतत कापूस किंवा मका घेणे टाळा, अशा प्रकारच्या एकाच पिकाच्या लागवडीमुळे विशिष्ट रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि जमिनीची पोषण शक्ती कमी होते.
नत्र स्त्री करण्यासाठी डाळवर्गीय पिके फायदेशीर!
डाळीवर्गीय पिके मूग ,उडत, चवळी, इत्यादी .जमिनीत “रायझोबियम” या सूक्ष्मजीवांचा साहाय्याने नत्र स्थिर करतात. त्यामुळे जमीन सुपीक होते. त्यामुळे पीक फेरपालट करताना डाळवर्गीय पिकांचा समावेश करणे फायदेशीर ठरते.
Soil Fertility 2025 मातीतील अन्यद्रव्य कमी होतात
प्रत्येक पीक विशिष्ट अन्यद्रव्य मोठ्या प्रमाणात शोषून घेत असते उदाहरणार्थ मका नत्राचा जास्त वापर करतो तर कापूस अधिक फॉस्फरस आणि पोटॅशियम वापरतो सतत तेच पीक घेतल्यास जमिनीतही अन्यद्रव्य संपून जातात.
Soil Fertility 2025 पिक फेरपालट केल्याचे फायदे!
जमिनीतील अन्नद्रव्यांचे संतुलन
- फेरपालट केल्याने विविध गोष्टी पिकांची अन्नद्रव्य वापरण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे सर्व प्रकारच्या अन्नद्रव्ये जमिनीत संतुलित राहतात.
रोग किडींचा प्रादुर्भाव कमी
- वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीमुळे एका विशिष्ट रोग किंवा किडीचा साठा कमी होतो. त्यामुळे रासायनिक फवारणीचे प्रमाण हे घटते.
उत्पादनात सातत्य आणि नफा
- फेरपालट केल्यास जमिनीची उत्पादकता टिकून राहते. परिणामी उत्पादनता सातत्य येते आणि खर्चात बचत होते.
पिक फेरपालट ही केवळ पारंपारिक शेतीतील बदल नसून, ती शाश्वत शेतीकडे नेणारी दिशादर्शक पद्धत आहे. आजच्या बदलत्या हवामान परिस्थितीत आणि जमिनीच्या सातत्याने होणाऱ्या घटत्या पोषण मूल्यांमध्ये पीक फेरपालट हा एक प्रभावी उपाय ठरतो.
शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षे एकाच पिकावर अवलंबून न राहता, जमिनीच्या प्रकृतीनुसार आणि हवामानाच्या अनुषंगाने पिकाची योग्य फेरपालट करावी.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |