Pik Nuksan Bharpai 2025 मान्सूनपूर्व पावसाने नुकसान झालेल्या उन्हाळी पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. त्यानुसार पंचनामाचे काम सुरू झाले आहेत.

पण अनेक शेतकऱ्यांनी पावसाने उघडीप दिल्यानंतर दिल्यानंतर पिकांची काढणी केली आहे, त्यामुळे पंचनामा कशाचा करायचा? असा पेच कृषी विभागापुढे आहे.
शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी ‘एआय’ फायदेशीर ठरू शकतो का? वाचा सविस्तर;
मे महिन्यात 20 दिवस अधून मधून जोरदार पाऊस झाला. उन्हाळी पिकांची काढणी मे च्या दुसऱ्या आठवड्या पर्यंत केली जाते. त्यानंतर खरीप पेरणीसाठी जमीन तयार केली जाते.

मात्र, यंदा पिके काढणीच्या वेळेस परिणामी उन्हाळी पिके शिवारातच उभी राहिली पाणी साचल्याने भात, भुईमुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
गेल्या तीन-चार दिवसापासून पावसाने उसंत घेतल्याने पंचनामे करण्याच्या सूचना कृषी सहाय्यक, तलाठी यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पंचनामांचे काम सुरू आहे. कृषी सहाय्यक, तलाठ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाणी करून फोटोसह नुकसानीचे नुकसान याची माहिती भरायची आहे.
पण अनेक ठिकाणी पाऊस थांबल्यानंतर अधिक नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी पिकांची काढणी केली आहे. त्यामुळे पंचनामा करायचा कसा असा पेच यंत्रणे समोर होता.
Pik Nuksan Bharpai 2025 पंचनाम्यासोबत आवश्यक कागदपत्रे
1 | बँक पासबुक झेरॉक्स |
2 | आधार कार्ड झेरॉक्स |
3 | 8 ‘अ’चा चालू उतारा |
4 | फार्मर आयडी नोंदणी प्रत |
5 | सामायिक क्षेत्र असेल तर संमती पत्र |
कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाईचा प्रस्ताव द्या
Pik Nuksan Bharpai 2025 विविध भागात नुकत्याच झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रारंभी राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला गेला. त्या विविध मंत्र्यांनी कापणी केलेल्या पिकांचे नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.
मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |