Nuksan Bharpai 2025 अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पुराने झालेल्या शेत पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम राज्य सरकारने कपात केली आहे. तसेच कमाल तीन ऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मदत देण्याचा निर्णयही घेतला आहे.

राज्यात नुकत्याच अवेळी पावसामुळे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पीकहानी संदर्भात दि.27.05.25 रोजी मा. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे निविष्ठा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यलो अलर्ट! ‘या’ 6 जिल्ह्यांना वादळीवाऱ्यांचा इशारा, वाचा सविस्तर;
Nuksan Bharpai 2025 शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई द्यावी, याचे निकष राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत राज्य सरकारने पूर्वी निश्चित केले होते आणि त्यानुसारच डिसेंबर 2023 पर्यंत मदत दिली जात होती.

मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने 1 जानेवारी 2024 रोजी एक जीआर काढला व मदतीचे दर आणि हेक्टरीची कमाल मर्यादित वाढ केली. त्यानुसारच मदत दिली जात होती. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत निश्चित मदतीचे निकष डावलून मदतीत वाढ करण्यात आली होती .
Nuksan Bharpai 2025 मात्र, सूत्रांनी सांगितले की राज्य आपत्ती प्रतिसाद निधीने निश्चित केले, त्या मर्यादितच नुकसानीसाठी मदत देणे बंधनकारक आहे, असे केंद्राने राज्याला कळविले आहे. त्यानुसार आता पूर्वीच्या म्हणजे 27 मार्च 2023 च्या निर्णयानुसार निश्चित केलेली नुकसान भरपाई आता दिली जाणार आहे.
शासन निर्णय पहा | येथे क्लिक करा |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |