Smart Cotton Project 2025 नागपूर राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पअंतर्गत सन 2020-21 मध्ये सुरू केलेल्या स्मार्ट कॉटन प्रकल्प अवघ्या चार वर्षानंतर गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील कापसाचे उत्पादन गुणवत्ता, मूल्यवर्धन व शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी हा प्रकल्प सुरू ठेवणे गरजेचे आहे.

कृषी विभागातील ‘आत्मा’ आणि कापूस उत्पादक पणन महासंघाचा सक्रिय असलेला हा प्रकल्प राज्यातील कापसाचे उत्पादन, गुणवत्ता व कापूस उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने कापसाचे मूल्यवर्धन करण्यासाठी अस्तित्वात आला.
खरीप 2024 ची नुकसान भरपाई मंजूर, इथे वाचा जिल्हा निहाय संपूर्ण यादी!
शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांच्या मार्फत ‘एक गाव, एक वाण’ हा प्रयोग करण्यात आला. या शेतकरी गटांनी कापूस थेट बाजारात विकण्याऐवजी कापसाचे जिनिंग व प्रेसिंग करून म्हणजेच रुईच्या गाठी व सरकी विकायला सुरुवात केली. या प्रयोगामुळे कापसाला बाजार भावापेक्षा अधिक दर मिळाला, अशी माहिती भानुदास बोधाने यांच्या सह शेतकऱ्यांनी दिली.

Smart Cotton Project 2025 विस्तारीकरणाला ब्रेक
- हा प्रकल्प सन 2023-24 पर्यंत विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती ,यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड व खानदेशातील जळगाव या 12 जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आला.
- सन 2024-25 मध्ये या प्रकल्पाचा विस्तार करण्याऐवजी यातील पाच जिल्हे कमी केले. त्यामुळे हा प्रकल्प सध्या अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या सात जिल्ह्यात राबविला जात आहे.
Smart Cotton Project 2025! 50.18 कोटींची तरतूद
2020-21 ते 2026-27 या कालावधीसाठी कापूस मूल्यसाखळी विकास शाळा प्रशिक्षण व विस्तार घटकाअंतर्गत 28.98 कोटी तसेच प्रकल्प अंमलबजावणी कक्ष महाकॉट व प्रकल्प अंमलबजावणी यासाठी 21.20 कोटी रुपयांची तरतूद केली होती.
Smart Cotton Project 2025 राज्यातील 1,819 गावांमध्ये 80 शेतकरी गटांनी रुईच्या 9,454 गाठींची निर्मिती केली.
हा प्रकल्प बंद न करता, त्यात शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी कापसाला प्रतिएकर प्रोत्साहन निधी द्यावा. कापसाचे उत्पादन वाढविण्यासाठी या प्रकल्पात सघन व अतिघन कापूस लागवडीचा अवलंब करावा. – गोविंद वैराळे, माजी सरव्यवस्थापक, कापूसपणन महासंघ.
या प्रकल्पात सुधारणा कराव्यात. आदी निवडक गावांमध्ये प्रयोग करून त्याचा विस्तार करावा. प्रकल्प बंद केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होईल. – भानुदास बोधाने, कृषी क्रांती शेतकरी गट, कोंढाळा जिल्हा चंद्रपूर.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |