Katepurna Dam Water 2025 अकोल्याची लाईफलाईन म्हणून काटेपूर्णा धरणात आता सविस्तर 26 टक्केच जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी पातळीत वेगाने कमी होत आहे. त्यामुळे पाण्याचे जरा जपूनच वापर करा, असे प्रशासनाने कळविले आहे. अकोला जिल्ह्याच्या कमाल तापमानात वाढ झाली असून, यामुळे बाष्पीभवन 16 मिमी वाढले आहे. अकोला शहराची लाईफलाईन काटेपूर्णा धरणात आता 26 टक्के शिल्लक आहे.

जिल्ह्यातील मोठ्या दोन प्रकल्पात 35 टक्के, 4 मध्यम प्रकल्पात 29 टक्के तर 24 लघुप्रकल्पात 26 टक्के एवढा जलसाठा शिल्लक आहे. कमाल तापमानात हे वाढ झाल्याने बाष्पीभवन वाढले आहे. परिणामी जलसाठ्यात घट होत असल्याने जिल्ह्यातील या सर्व सिंचन प्रकल्पातील पाणी पातळी वेगाने कमी होत आहे.
मराठवाड्याची सिंचन क्षमता 1.61 लाख हेक्टरने वाढणार; जलसंपदाकडून ‘या’ प्रकल्पांची कामे सुरू;
Katepurna Dam Water 2025 अकोला शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या काठी पूर्ण धरणाची जल पातळी 26 टक्क्यांवर आली असून, तेल्हारा तालुक्यातील वान धरणाची पातळी 38 टक्के एवढी आहे. खारपानपट्ट्यातील गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. महिला, पुरुष व बालकांना दूरवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईच्या उपाययोजनांची यादी तयार करून कामाचे आदेश दिले आहेत. परंतु या कामाला विलंब होत आहे.

Katepurna Dam Water 2025 उपाययोजना करा!
उपाययोजनांची कामे अद्याप पूर्ण झाली नसल्याने गावकऱ्यांचे पाण्याविना हाल होत आहेत. अनेक भागात हापश्या बंद पडल्या आहेत.
नळ योजनेचे काम अपुरे आहे, यामुळे प्रशासनाने तत्काळ उपाययोजनांची कामे करून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थातून उमटत आहे.
Katepurna Dam Water 2025 पाणी जपून वापरा!
धरणातील पाण्याचा साठा कमी होत असल्याने प्रत्येकाने पाणी जपून वापरावे, पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन जिल्हा, महापालिका व जलसंपदा विभागाने केले आहे.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |